शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४ दिवसांत ४८९ दिव्यांगांना साहित्य वाटप

By admin | Updated: October 19, 2016 03:22 IST

मागील १४ आॅक्टोबरपासून धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेल्या जयपूर फूट,

‘जयपूर फूट’ वाटप शिबिर : राज्यभरातील दिव्यांगांची गर्दी नागपूर : मागील १४ आॅक्टोबरपासून धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेल्या जयपूर फूट, साहित्य व साधने वाटप शिबिरात आतापर्यंत तब्बल ४८९ दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जिल्हा परिषद आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे १४ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पुढील २५ आॅक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात दोन हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांना साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यातच आतापर्यंत मागील चार दिवसांत ६९७ लोकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४८९ लाभार्थीना साहित्य वाटप करण्यात आले आहे. यात ४०२ लाभार्थींना जयपूर फूट व कॅलिपर आणि ८७ लाभार्थींना श्रवणयंत्र देण्यात आले आहे. या शिबिरात रोज राज्यभरातील लोक येत आहेत. बाहेरून येणाऱ्या या सर्व लोकांसाठी येथे नि:शुल्क नाश्ता, चहा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोयी-सुविधेचा येथे रोज शेकडो दिव्यांग आणि त्यांचे नातेवाईक लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या दिव्यांगांमध्ये ७० वर्षांच्या वृद्धापासून तर अगदी दोन-तीन वर्षांच्या चिमुकल्यांचा सुद्धा समावेश आहे. (प्रतिनिधी)येथेच थाटले वर्कशॉप भगवान महावीर विकलांग सहायता समितीने शिबिरात येणाऱ्या दिव्यांगांना तात्काळ जयपूर फूट व कॅलिपर मिळावे यासाठी यशवंत स्टेडियममध्येच वर्कशॉप थाटले आहे. या वर्कशॉपमध्ये जयपूरवरून आलेले सुमारे ३० कारागीर रात्रंदिवस काम करून रोज ६० ते ७० जयपूर फूट आणि कॅलिपर तयार करीत आहे. विशेष म्हणजे, या ३० कारागिरांपैकी सुमारे ५ ते ६ कारागीर स्वत: अपंग असून ते जयपूर फूटवर चालत आहे. याशिवाय येथे मनपा कर्मचाऱ्यांची चमू सुद्धा रात्रंदिवस राबत आहे. शिबिरात प्रत्येक दिवशी अपेक्षित संख्येपेक्षा कितीतरी अधिक दिव्यांग येत असून, त्या प्रत्येकाला साहित्य वाटप केले जात आहे. जयपूर फूटने स्वावलंबी बनविलेनागपूर : वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी मागील १९८६ मध्ये एका रेल्वे अपघातात दोन्ही पाय गेले. त्यावेळी आपण कायमचे अपंग झालो, असा विचार करून खचलो होतो. परंतु काहीच दिवसांत भगवान महावीर विकलांग सहायता समितीद्वारे जयपूर फूटची माहिती मिळाली, आणि जगण्याची हिंमत आली. त्यानंतर जयपूर फूटच्या मदतीने मी पुन्हा दोन्ही पायावर उभा झालो. चालू लागलो. अगरबत्तीचा व्यवसाय करून स्वत:चे पोट भरू लागलो. त्यामुळे आज मी स्ववलंबी जीवन जगत आहे. निराधार म्हणून शासनाकडून महिन्याला ६०० रुपयांचा पगार मिळतो, परंतु तो मी वृद्घ आईला देतो. या शिबिरात आता नवीन दोन्ही जयपूर फूट मिळाले आहे. त्यामुळे भविष्याची चिंता मिटली आहे. हरी दौलत गोळे, मुरलीधर कॉम्प्लेक्स, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर.