शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

३४८ कोटीच्या नुकसानीचा आरोप, हायकोर्टाने फेटाळली याचिका

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 28, 2023 18:16 IST

अमरावती मनपाला दिलासा : मल्टीप्लेक्सचा मार्ग मोकळा

नागपूर : मल्टीप्लेक्स बांधण्यासाठी बडनेरा रोडवरील नवाथे चौक येथील ७ हजार ४४२ चौरस मीटर जमीन केवळ १२ कोटी रुपयांमध्ये ३० वर्षांच्या लीजवर दिल्यास अमरावती महानगरपालिकेचे ३४८ कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला.

माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ मुन्ना नारायणसिंग राठोड, रामकृष्ण विठ्ठलराव सोलंके, प्रवीण रामकृष्ण डांगे व काँग्रेसचे पदाधिकारी समीर रमेशराव जवंजाळ यांनी ही याचिका दाखल केली होती. महानगरपालिका या जमिनीवर स्वत:च मल्टीप्लेक्स बांधणार होती. त्यासाठी २० जुलै २०१७ रोजी ठराव परीत केला गेला होता. परंतु, या बांधकामावर १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने आणि एवढा खर्च करणे मनपाला शक्य नसल्याची बाब लक्षात घेता हे मल्टीप्लेक्स बीओटी तत्वावर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासंदर्भात २२ सप्टेंबर २०२२ रोजी नवीन ठराव पारीत करण्यात आला. तसेच, २३ डिसेंबर २०२२ रोजी नोटीस जारी करून इच्छुक कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानंतर १२ कोटी ३७ लाख रुपयाची सर्वाधिक बोली लावल्यामुळे नांदेड येथील शंकर कंस्ट्रक्शनला मल्टीप्लेक्स बांधण्याचा कार्यादेश देण्यात आला. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. ही टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर आहे. हा मोठा आर्थिक घोटाळा आहे. करिता, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि लीज टेंडर रद्द करण्यात यावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता याचिकाकर्त्यांचे मुद्दे गुणवत्ताहीन आहेत आणि या टेंडरमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे जाहीर केले.

याचिकाकर्त्यांना फटकारले

शंकर कंस्ट्रक्शनने प्रतिज्ञापत्र दाखल करून याचिकाकर्त्यांविरुद्धच्या विविध गुन्ह्यांची माहिती न्यायालयाला दिली. तसेच, संबंधित गुन्ह्यांची माहिती याचिकाकर्त्यांनी जाहीर केली नाही, असे सांगितले. मनपानेही याचिकेचा विरोध केला. राठोड यांनी आधीही एका टेंडर प्रकरणात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने २५ ऑक्टोबर २००७ रोजी ती याचिका फेटाळून राठोड यांच्यावर १० हजार रुपये दावा खर्च बसविला होता, याकडे मनपाने लक्ष वेधले. त्यावरून उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले व जनहित याचिका दाखल करणाऱ्यांनी स्वत:विरुद्धच्या दिवाणी, फौजदारी व महसूल खटल्याची माहिती देणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय