शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

३४८ कोटीच्या नुकसानीचा आरोप, हायकोर्टाने फेटाळली याचिका

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 28, 2023 18:16 IST

अमरावती मनपाला दिलासा : मल्टीप्लेक्सचा मार्ग मोकळा

नागपूर : मल्टीप्लेक्स बांधण्यासाठी बडनेरा रोडवरील नवाथे चौक येथील ७ हजार ४४२ चौरस मीटर जमीन केवळ १२ कोटी रुपयांमध्ये ३० वर्षांच्या लीजवर दिल्यास अमरावती महानगरपालिकेचे ३४८ कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला.

माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ मुन्ना नारायणसिंग राठोड, रामकृष्ण विठ्ठलराव सोलंके, प्रवीण रामकृष्ण डांगे व काँग्रेसचे पदाधिकारी समीर रमेशराव जवंजाळ यांनी ही याचिका दाखल केली होती. महानगरपालिका या जमिनीवर स्वत:च मल्टीप्लेक्स बांधणार होती. त्यासाठी २० जुलै २०१७ रोजी ठराव परीत केला गेला होता. परंतु, या बांधकामावर १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने आणि एवढा खर्च करणे मनपाला शक्य नसल्याची बाब लक्षात घेता हे मल्टीप्लेक्स बीओटी तत्वावर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासंदर्भात २२ सप्टेंबर २०२२ रोजी नवीन ठराव पारीत करण्यात आला. तसेच, २३ डिसेंबर २०२२ रोजी नोटीस जारी करून इच्छुक कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानंतर १२ कोटी ३७ लाख रुपयाची सर्वाधिक बोली लावल्यामुळे नांदेड येथील शंकर कंस्ट्रक्शनला मल्टीप्लेक्स बांधण्याचा कार्यादेश देण्यात आला. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. ही टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर आहे. हा मोठा आर्थिक घोटाळा आहे. करिता, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि लीज टेंडर रद्द करण्यात यावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता याचिकाकर्त्यांचे मुद्दे गुणवत्ताहीन आहेत आणि या टेंडरमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे जाहीर केले.

याचिकाकर्त्यांना फटकारले

शंकर कंस्ट्रक्शनने प्रतिज्ञापत्र दाखल करून याचिकाकर्त्यांविरुद्धच्या विविध गुन्ह्यांची माहिती न्यायालयाला दिली. तसेच, संबंधित गुन्ह्यांची माहिती याचिकाकर्त्यांनी जाहीर केली नाही, असे सांगितले. मनपानेही याचिकेचा विरोध केला. राठोड यांनी आधीही एका टेंडर प्रकरणात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने २५ ऑक्टोबर २००७ रोजी ती याचिका फेटाळून राठोड यांच्यावर १० हजार रुपये दावा खर्च बसविला होता, याकडे मनपाने लक्ष वेधले. त्यावरून उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले व जनहित याचिका दाखल करणाऱ्यांनी स्वत:विरुद्धच्या दिवाणी, फौजदारी व महसूल खटल्याची माहिती देणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय