शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

२८ डिसेंबरपासून अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने रात्री ९ नंतर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 22:40 IST

Nagpur News ओमायक्रॉनसह वाढत्या कोविड संक्रमणामुळे नागपुरात पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाने रात्री ९ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

ठळक मुद्देचित्रपटगृह, रेस्टाॅरंटसह कार्यक्रम, लग्नही रात्री ९ पर्यंतच

नागपूर : ओमायक्रॉनसह वाढत्या कोविड संक्रमणामुळे नागपुरात पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या २८ तारखेपासून प्रशासनाने रात्री ९ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कडक जमाावबंदी लागू राहील.

जिल्हाधिकारी विमला आर. व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. यापूर्वी कोविडचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारच्या जमावबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. शनिवारी जिल्ह्यात कोविडचे २४ रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नवीन नियमानुसार आता दुकाने रात्री ९ व शॉपिंग मॉल रात्री ९ वाजेपर्यंतच सुरू राहतील.  चित्रपटगृहे व हॉटेल्स ही १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. खेळांच्या स्पर्धा होतील, परंतु त्यात प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, संमेलन रात्री ९ वाजेपर्यंतच होऊ शकतील. लग्न समारंभसुद्धा रात्री ९ वाजेपर्यंतच संपवावे लागतील. ते सुद्धा बंद सभागृहात असेल तर जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळ्या जागेत असेल तर जास्तीत जास्त २५० लाेक उपस्थित राहू शकतील. शाळा-महाविद्यालयासंदर्भात सरकारच्या मागच्या आदेशांना कायम ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने आदेश जारी करीत नागरिकांना सहकार्य करण्याची तसेच मास्कशिवाय घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉन