शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका 

By योगेश पांडे | Updated: December 21, 2023 18:48 IST

दोन दिवसांअगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीमबागेत पोहोचलेल्या भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

नागपूर : जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून राजकारण परत तापत असल्याचे दिसून येत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर याबाबत ठोस भूमिका मांडली आहे. जातनिहाय जनगणनेतून समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित आहे. मात्र असे करत असताना देशातील सामाजिक सद्भाव, अखंडता व सामाजिक समरसतेला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले.

दोन दिवसांअगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीमबागेत पोहोचलेल्या भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर बोलताना विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जातीव्यवस्था कालबाह्य आहे. जर जनगणनेमुळे विषमता व तेढ वाढत असेल तर त्याची गरज नाही. समाजात सामाजिक समरसता वाढली पाहिजे यावरच भर द्यायला हवा, असे म्हटले होते. यावरून काही राजकीय पक्षांनी संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे अशी भूमिका मांडली होती. देशातील काही राज्यांत यावरून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना अखेर सुनिल आंबेकर यांनी संघाची अधिकृत भूमिका मांडली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारचा भेदभाव व विषमतेपासून मुक्त तसेच समरसता व सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. विविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिले. त्यांचा विकास आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध शासनांकडून वेळोवेळी अनेक योजना राबविण्यात येत आहेत व संघाचे या पुढाकाराला समर्थन आहे. मागील काही काळापासून जातनिहाय जनगणनेची चर्चा परत सुरू झाली आहे. मात्र याचा उपयोग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी झाला पाहिजे, असे संघाचे स्पष्ट मत असल्याची भूमिका आंबेकर यांनी मांडली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ