शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका 

By योगेश पांडे | Updated: December 21, 2023 18:48 IST

दोन दिवसांअगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीमबागेत पोहोचलेल्या भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

नागपूर : जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून राजकारण परत तापत असल्याचे दिसून येत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर याबाबत ठोस भूमिका मांडली आहे. जातनिहाय जनगणनेतून समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित आहे. मात्र असे करत असताना देशातील सामाजिक सद्भाव, अखंडता व सामाजिक समरसतेला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले.

दोन दिवसांअगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीमबागेत पोहोचलेल्या भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर बोलताना विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जातीव्यवस्था कालबाह्य आहे. जर जनगणनेमुळे विषमता व तेढ वाढत असेल तर त्याची गरज नाही. समाजात सामाजिक समरसता वाढली पाहिजे यावरच भर द्यायला हवा, असे म्हटले होते. यावरून काही राजकीय पक्षांनी संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे अशी भूमिका मांडली होती. देशातील काही राज्यांत यावरून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना अखेर सुनिल आंबेकर यांनी संघाची अधिकृत भूमिका मांडली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारचा भेदभाव व विषमतेपासून मुक्त तसेच समरसता व सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. विविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिले. त्यांचा विकास आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध शासनांकडून वेळोवेळी अनेक योजना राबविण्यात येत आहेत व संघाचे या पुढाकाराला समर्थन आहे. मागील काही काळापासून जातनिहाय जनगणनेची चर्चा परत सुरू झाली आहे. मात्र याचा उपयोग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी झाला पाहिजे, असे संघाचे स्पष्ट मत असल्याची भूमिका आंबेकर यांनी मांडली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ