शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

सारे काही आरक्षणासाठी...

By admin | Updated: September 1, 2014 01:09 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा मुख्य मुद्दा राहणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. या समाजाला आरक्षण मिळाले, तर बारामती व म्हाडा

मागासवर्गीय कृती समिती निवडणूक लढविणार : संजय हेडाऊ यांची माहिती नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा मुख्य मुद्दा राहणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. या समाजाला आरक्षण मिळाले, तर बारामती व म्हाडा त्यांच्या हातून जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने अजूनपर्यंत केंद्राकडे प्रस्ताव पाठविलेला नाही. यावरून सत्तेत सहभागी झाल्याशिवाय मागावर्गीय समाजाचा विकास शक्य नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धनगर समाज संघर्ष समिती व मागासवर्गीय कृती समितीने आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात ६० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी भाजप-सेना महायुतीशी चर्चा करून, जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती मागासवर्गीय कृती समितीचे अध्यक्ष संजय हेडाऊ यांनी दिली. धनगर समाज संघर्ष समिती व मागासवर्गीय कृती समितीच्यावतीने ‘आरक्षणासाठी राजकीय हक्क परिषदेचे’ रविवारी हुडकेश्वर रोडवरील लोहार समाज भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित एका पत्रपरिषदेत ते बोलत होते. हेडाऊ पुढे म्हणाले, ५० ते ९० हजार मतदारसंख्या असलेल्या समाजाला त्या क्षेत्रात प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यानुसार कृती समितीने चिमूर, हिंगणा, आर्णी, गडचिरोली, आमगाव, अलिबाग, विक्रमगड व राळेगाव यासारख्या मतदार क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील धनगर, हलबा, माना, गोवारी, छत्री, इंजवार, बिंजवार, कोळी, महादेव कोळी, मन्नेवार व ठाकूर अशा विविध ३३ जाती एकत्र आल्या आहेत. या सर्व समाजाचे मतदान आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे महायुतीने आमच्या मागणीनुसार जागा दिल्या नाहीत, तर स्वबळावर १०० ते १२५ जागा लढविण्याची सुद्धा तयारी असल्याचे यावेळी हेडाऊ यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला धनगर समाज संघर्ष समितीचे डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री रमेश गजभिये, माजी आमदार अनंत कुमार पाटील व विजय मोरे उपस्थित होते. परिषदेत तीन ठराव पारित धनगर समाज संघर्ष समिती व मागासवर्गीय कृती समितीच्यावतीने आयोजित ‘आरक्षणासाठी राजकीय हक्क परिषदेत’ विविध अन्यायग्रस्त मागासवर्गीय समाजातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. मागासवर्गीय कृती समितीचे अध्यक्ष संजय हेडाऊ, धनगर समाज संघर्ष समितीचे डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री दशरथ भान, माजी विजय मोरे, डॉ. शिवाजी दळणार, डॉ. बबनराव लोखंडे, डॉ. संदीप डोहणे, डॉ. मंगेश गुलवाडे, अनंत कुमार पाटील, विठ्ठल रबदाडे व प्रकाश निमजे यांच्यासह आदी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या परिषदेत प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या समाजापुढील समस्यांकडे लक्ष वेधून, त्यांचा आजपर्यंत केवळ राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यात आल्याचा संताप व्यक्त केला. दरम्यान परिषदेच्या शेवटी तीन ठराव पारित करण्यात आले. या ठरावात अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागावर ३३ अन्यायग्रस्त आदिवासी समाजातील लोकांनाच उमेदवारी देण्यात यावी, निवडून येणाऱ्या आमदारांनी आरक्षणाचा प्रश्न उचलून धरावा व कृती समितीची कोर कमिटी तयार करून, महायुतीने उमेद्वारीही द्यावी, अशा प्रमुख मुद्यांचा समावेश करण्यात आला. (प्रतिनिधी)