शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

सर्व उघडले पण बसची संख्या वाढली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:12 IST

मनपा प्रशासनही टाळतोय स्वत:ची जबाबदारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर आता बऱ्यापैकी अनलॉक झाले आहे. सर्व काही उघडले ...

मनपा प्रशासनही टाळतोय स्वत:ची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर आता बऱ्यापैकी अनलॉक झाले आहे. सर्व काही उघडले आहेत, परंतु शहरातील सार्वजनिक व्यवस्था मात्र आहे तशीच आहे. बसची संख्याही वाढलेली नाही. मनपा प्रशासनही बससेवा तोट्यात असल्याचे सांगत आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. एकूणच नागरिकांना शहर बससेवा योग्यपणे उपलब्ध करून देण्यात सत्तापक्ष पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी शहरात ३६० बस चालत होत्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास ७ महिन्यांपर्यंत बससेवा पूर्णपणे बंद होती. तेव्हापासून बससेवा सुरळीत झालीच नाही. सध्या २०० बस धावत आहेत. फेऱ्या सुद्धा कमी करण्यात आल्या आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत मार्केट सुरु होते. तेव्हा सुद्धा इतक्याच बस व फेऱ्या सुरु होत्या. आता मार्केट रात्री १० वाजेपर्यंत सुरु आहे. सर्व काही उघडले आहे. त्यामुळे बसची संख्याही वाढवण्याची गरज आहे. अनेक मार्गावर बससेवा सुरु करण्याची मागणी होत आहे. परंतु

शहर बससेवा संचलित करणाऱ्या कंपन्या काही ऐकायलाच तयार नाही.

- नागरिक संतापले तर सांभाळणे कठीण होईल

परिवहन सेवा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. तोट्याचा प्रश्नच निर्माण हाेत नाही. आपल्या बसवर खर्च होणाऱ्या एकूण रकमेपैकी ० ते ४५ टक्के रक्कम ही तिकिटांच्या कमाईतून येते. अशा परिस्थितीत बस पूर्णपणे तोट्यात आहे असे म्हणता येणार नाही. घनकचरा व्यवस्थापनातूनही मनपाला कमाई होत नाही. तेव्हा कचरा उचलणेच बंद करावे का? अधिकाऱ्यांनी ही बाब समजून घ्यायला हवी. अन्यथा नागरिक संतापले तर त्यांना सांभाळणे कठीण होईल.

बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती मनपा