शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

२०२७ पर्यंत ‘बेस्ट’मध्ये सर्व ताफा, ‘ई-बस’चा ३,२०० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

By योगेश पांडे | Updated: December 13, 2023 17:02 IST

सुनिल शिंदे, विलास पोतनीस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बेस्टच्या बसेसचा मुद्दा उपस्थित केला होता.

नागपूर : मुंबईची ‘सेकंड लाईफलाईन’ मानण्यात येणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात २०२७ पर्यंत सर्व गाड्या ‘ई-बस’ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने पावलेदेखील उचलण्यात येत असून लवकरच ३ हजार २०० बस समाविष्ट होतील, अशी माहिती राज्य शासनातर्फे बुधवारी विधानपरिषदेत देण्यात आली.

सुनिल शिंदे, विलास पोतनीस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बेस्टच्या बसेसचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर राज्य शासनातर्फे उदय सामंत यांनी ही माहिती दिली. २०१८-१९ मध्ये बेस्टची प्रवासीसंख्या दरदिवशी २२ लाख इतकी होती. आता ही संख्या ३३ लाखांवर गेली आहे. सद्यस्थितीत बेस्टकडे ३५ डबल डेकर व ४५ सिंगल डेकर ई-बसेस आहेत. बेस्टतर्फे २ हजार १०० एकमजली, ९०० डबल डेकर व २०० सीएनजी अशा ३ हजार २०० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जास्त ई-बसेससाठी केंद्राकडेदेखील पाठपुरावा करण्यात येईल. बेस्ट वर्कर्स युनियन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातील करारानुसार बेस्टचा स्वमालकीचा बसताफा हा ३ हजार ३३७ इतका कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी बेस्टने महानगरपालिकेकडे निधीची मागणी केली आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान महानगरपालिकेकडून बेस्टला ५ हजार ६७८ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे, अशी माहिती सामंत यांनी केली.

भाड्याच्या बस वाढविण्यावर भरबेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या बसेसचा खर्च दर किलोमीटरला १९३.६४ रुपये इतका आहे. तर भाडेतत्वावरील बसेसचा खर्च दर किलोमीटरला १२० रुपये असा आहे. त्यामुळेच भाड्याच्या बसेसची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.