शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
2
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
3
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
4
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
5
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
6
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
7
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
8
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
9
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
10
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
11
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
12
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
13
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
14
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
15
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
16
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
17
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
18
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
19
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
20
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सर्व बालगृहांची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:26 IST

बिहारमधील बालगृहातील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर केंद्र शासनाला अखेर जाग आली आहे. केंद्राच्या निर्देशावरुन नागपुरातील बालगृहांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेंद्राचे निर्देश बिहारमधील अत्याचाराच्या घटनांनंतर उचलले पाऊल

मेघा तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारमधील बालगृहातील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर केंद्र शासनाला अखेर जाग आली आहे. केंद्राच्या निर्देशावरुन नागपुरातील बालगृहांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष समिती नेमण्यात आली असून सप्टेंबरपर्यंत तपासणीचा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.बिहारमध्ये बालगृहातील ७ ते १८ वयोगटातील ३४ मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता, असा अहवाल ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस’तर्फे देण्यात आला. लैंगिक अत्याचाराच्या या घटनांची केंद्राने गंभीर दखल घेतली व प्रत्येक बालगृहाची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले. नागपुरात सद्यस्थितीला १२ बालगृहे आहेत व यात मुलेमुली मिळून एकूण ४०० जण राहतात. नागपुरात बिहारसारखी घटना घडू नये यासाठी बालगृहांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. ४ व ५ सप्टेंबर रोजी विशेष पथकाद्वारे ही तपासणी होईल, अशी माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजय सिंह परदेशी यांनी दिली. तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात येणार आहे. नागपुरात आम्ही प्रत्येक महिन्यात बालगृहांची तपासणी करतोच. आतापर्यंत आम्हाला काहीही गैरप्रकार आढळून आला नाही. सोबतच आम्ही ‘पोक्सो’सारख्या कायद्यांची माहितीदेखील बालगृहातील मुलामुलींना देतो. आता सर्वंकष तपासणी होईल, असे त्यांनी सांगितले.

मानसोपचार तज्ज्ञांचा राहणार समावेशबालगृहांची तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या पथकात सात जणांचा समावेश असेल. यात बालकल्याण समिती, बालन्याय मंडळ, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. सोबतच एका मानसोपचारतज्ज्ञाचादेखील समावेश असेल. हे पथक मुलामुलींशी संवाद साधेल व त्यांच्या मानसिकतेचा अंदाजदेखील घेण्यात येईल, अशी माहिती परदेशी यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकार