शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधामुळे शहरातील सर्व व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना महामारीत मार्च २०२० पासून नागपूर जिल्ह्यातील व्यवसाय मंदीत आणि व्यापारी संकटात असून शासनाने व्यापाऱ्यांना सवलतींचे ऑक्सिजन ...

नागपूर : कोरोना महामारीत मार्च २०२० पासून नागपूर जिल्ह्यातील व्यवसाय मंदीत आणि व्यापारी संकटात असून शासनाने व्यापाऱ्यांना सवलतींचे ऑक्सिजन न दिल्यास स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीचा गेल्यावर्षी मार्चमध्ये नागपूर जिल्ह्यात प्रवेश होताच व्यापाऱ्यांना संकटाचे दिवस पाहावे लागत आहेत. पूर्वी अडीच महिने लॉकडाऊन आणि नंतर अनलॉक प्रक्रियेत विविध क्षेत्र निर्बंधात राहिले. ऑक्टोबरनंतर काहीसा दिलासा मिळाला आणि दिवाळी सणात व्यवसाय रुळावर आल्याने व्यापारी आनंदी झाले. त्यानंतर व्यवसायाने जोर पकडला. व्यवसाय वाढीचा वेग नवीन वर्षात फेब्रुवारीपर्यंत चांगला होता. पण त्यानंतर संक्रमणाने हळूहळू वेग पकडला आणि एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनामुळे शहरात हाहाकार माजला. अशा स्थितीत दुकाने ताळेबंद करण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊन हटविण्यात आले, पण वेळेचे निर्बंध लावण्यात आले. स्थितीची समीक्षा करून नागपुरात संक्रमणाचा दर कमी झाला आणि रिकव्हरी दर वाढल्याने राज्य शासनाने लेव्हल-१ अंतर्गत सवलती दिल्या आणि दुकाने केवळ पाच दिवस रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली.

त्यानंतर शासनाने डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या नावावर नागपूरला लेव्हल-१ मधून लेव्हल-३ मध्ये टाकले आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात नागपुरात १५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी दिली.

मेहाडिया म्हणाले, जिल्ह्यातील व्यापारी लॉकडाऊनने त्रस्त झाले असून निर्बंधामुळे व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. वेळेवर सवलतींचे ऑक्सिजन न मिळाल्यास स्थिती हाताबाहेर जाईल आणि व्यापाऱ्यांवर उपाशी मरण्याची पाळी येईल. तिसरी लाट येईल, तेव्हा प्रशासनाने निश्चितच लॉकडाऊन लावावे, पण सध्या स्थिती आटोक्यात असल्याने दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी आणि व्यापाऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी. नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव तरुण निर्बाण म्हणाले, शेतकरी आत्महत्येसारखी स्थिती व्यापाऱ्यांवर येऊ नये. नागपूर जिल्ह्याची सुस्थिती पाहता दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. सध्या व्यापारी संकटात असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

प्रॉपर्टी विकण्यास बाध्य

ट्रान्सपोर्ट, कॅटरिंग, सलून व्यवसायासह सर्वच व्यावसायिक क्षेत्रावर कोरोनामुळे संकट आले आहे. निरंतर लॉकडाऊन आणि वेळेच्या निर्बंधामुळे अनेक व्यापाऱ्यांना घरखर्च चालविणे कठीण झाले आहे. अनेकांनी दुकाने नेहमीसाठीच बंद केली आहे तर कुणी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी प्रॉपर्टी व दागिने विकले आहेत. अशा व्यापाऱ्यांना मदत करण्याची मागणी अश्विन मेहाडिया आणि तरुण निर्बाण यांनी केली आहे.