शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

अकोल्याची अवनी राज्यात टॉप

By admin | Updated: June 18, 2014 01:29 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंभे हिने

विक्रमी निकालात मुलींचा दबदबा: दहावीत ८८़३२% विद्यार्थी उत्तीर्ण नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंभे हिने ४९६ (९९.२० टक्के) गुण मिळवीत राज्यात पहिले स्थान पटकाविले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील देऊळगावराजा विद्यालयाचा प्रणय गोपाळराव करपे हा ४९५ (९९ टक्के) गुण घेत विदर्भात दुसरा तर अकोला येथील ज्योती जानोरकर विद्यालयाची प्राची मधुकर जानोरकर तर नागपूर येथील पंडित बच्छराज व्यास विद्यालयाचा शुभम पाटील यांनी ४९४ (९८.८० टक्के) गुण मिळवीत तिसरे स्थान पटकाविले आहे. या परीक्षेत नागपूर विभागाचा निकाल ८२.९३ टक्के तर अमरावती विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला आहे. नागपूर विभागातून ८२.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा ८.९४ टक्के वाढ झालेली आहे. राज्यातील मंडळांच्या क्रमवारीत विभागाचा शेवटून दुसरा क्रमांक आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय सचिव अनिल पारधी यांनी निकालाची घोषणा केली. पंडित बच्छराज व्यास विद्यालय येथील धनश्री पुंजाराम पाठे व साऊथ पॉईन्ट शाळा येथील मीनल खानोरकर या विद्यार्थिनींनी ९८.६० टक्के (४९३) गुणांसह संयुक्तरीत्या दुसरे स्थान पटकाविले. तर सोमलवार रामदासपेठ शाळेची रिया घोडे व प्रेरणा हायस्कूल येथील प्रगती हिंगे या ९८.४० टक्के (४९२) गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागातून १,७६,४०० नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांच्यापैकी १, ४५, ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून ८९,०५२ पैकी ७४,३१९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.३९ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८०.५० टक्के इतके आहे. विभागातून २१,३६५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ४८,५५१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्यात यश मिळविले आहे. नागपूर जिल्ह्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल भंडारा जिल्ह्याचा (७४.६९) लागला आहे. माध्यमिक शाळांना २६ जून रोजी गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येईल. अमरावती विभागअमरावती विभागातून ८८.०१ टक्के निकालासह वाशीम जिल्हा अव्वल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी १० ने वाढली आहे. विभागातून परीक्षेला १ लाख ६४ हजार १०३ विद्यार्थी बसले होते. यामधून १ लाख ३८ हजार ०२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला आहे. अमरावती जिल्ह्यातून सुमारे ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८२.५४ टक्के इतकी आहे. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील प्रबोधन हायस्कूलचे वैभव कडू व राज गावंडे जिल्ह्यातून प्रथम आले आहेत. त्यांना ९८.२० टक्के गुण मिळाले तर अमरावती येथील सेंट फ्रान्सीस हायस्कूलचा शुभम करवा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला ९८ टक्के गुण मिळाले. यवतमाळ येथील लो.बा. अणे विद्यालयाचा जसवंतसिंग पवार याला ९८.२० टक्के गुण मिळाले. तो जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंभे ही ४९६ (९९.२0 टक्के) गुण घेऊन अमरावती विभागातून प्रथम आली आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील देऊळगावराजा विद्यालयाचा प्रणय गोपाळराव करपे हा ४९५ (९९ टक्के) गुण घेत विभागातून दुसरा तर अकोला येथील ज्योती जानोरकर विद्यालयाची प्राची मधुकर जानोरकर ही ४९४ (९८.८० टक्के) गुण मिळवीत तृतीय क्रमांकावर आहे. या परीक्षेत अमरावती विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील प्रबोधन हायस्कूलचे वैभव कडू व राज गावंडे जिल्ह्यातून प्रथम आले आहेत. त्यांना ९८.२० टक्के गुण मिळाले तर अमरावती येथील सेंट फ्रान्सीस हायस्कूलचा शुभम करवा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला ९८ टक्के गुण मिळाले. यवतमाळ येथील लो.बा. अणे विद्यालयाचा जसवंतसिंग पवार याला ९८.२० टक्के गुण मिळाले. तो जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर आहे. अमरावती विभागातून ८८.०१ टक्के निकालासह वाशीम जिल्हा अव्वल ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी १० ने वाढली आहे. विभागातून परीक्षेला १ लाख ६४ हजार १०३ विद्यार्थी बसले होते. यामधून १ लाख ३८ हजार ०२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला आहे. अमरावती जिल्ह्यातून सुमारे ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८२.५४ टक्के इतकी आहे. अकोला जिल्ह्यातील २६ हजार ६३३ परीक्षार्थ्यांपैकी २१ हजार ५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८०.७५ इतकी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३८ हजार ४१७ विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार २६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जिल्ह्याचा निकाल ८६.५८ टक्के लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यातून ३७ हजार ०१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले यवतमाळचा निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. वाशिम जिल्ह्यातील १८ हजार ५६१ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळचा निकाल ८८.०१ टक्के लागला आहे. अमरावती विभागातून १ लाख ३८ हजार २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ७१ हजार ६४८ विद्यार्थी आणि ६६ हजार ३७५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षी अमरावती विभागाचा निकाल ७४.७ टक्के लागला होता. यंदा निकालामध्ये १० टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. (प्रतिनिधी)