शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अजित पवार कधीच सत्तेत येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 17:27 IST

Nagpur News अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात राज्यात मोगलशाहीसारखं एकतर्फी सरकार चालवलं आहे. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत, असे प्रत्क्त्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरेंनी टोमणे सभा बंद कराव्या

कमलेश वानखेडे

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सत्ता गेल्यावर पुन्हा सत्तेची स्वप्न पडायला लागली आहेत. अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात राज्यात मोगलशाहीसारखं एकतर्फी सरकार चालवलं आहे. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी टोमणे सभा बंद करून महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करावा, अन्यथा त्यांच्या सोबत असणारे लोकही साथ सोडून जातील. त्यांचा पक्ष हम दो, हमारे दो या अवस्थेत उरेल असा सल्ला त्यांनी दिला.

नवे सरकार आल्यावर राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. हिंदू व इतर धर्मियांच्या सणावर असलेली बंदी उठली आहे. यामुळे राज्यात सर्वत्र हर्षउल्हासाचे वातावरण आहे, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

भुजबळ हे राष्ट्रवादीतील ओवेसी

- सरस्वतीवर छगन भुजबळ यांनी केलेली टीका दुर्दैवी आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान करणारे ते राष्ट्रवादीमधील औवेसी आहेत. अशी टीका बावनकुळे यांनी केली.

नाना पटोलेंना गांभीर्याने घेऊ नका !

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेबद्दल नाना पटोले यांना माहिती नाही असे सांगून बावनकुळे म्हणाले, २०१४ ते २०१९ या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्राने त्यांची क्षमता बघितली आहे. फडणवीस यांचे काही प्रायव्हेट व्यवसाय नाहीत. त्यामुळे ते सहा नाही तर आठ जिल्हे सांभाळू शकतात. पटोले गोंधळलेले आहेत, त्यांचा बॅलन्स सुटला आहे, त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे ते अशी विधाने करून गांधी कुटुंबीयांजवळ आहोत हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे