शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अजनी रेल्वे पुलावर रोज होतो अनेकांच्या जीविताशी खेळ; ॲम्ब्युलन्सही अडकून पडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 21:10 IST

Nagpur News अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात.

ठळक मुद्देरोजच होतो सकाळ, सायंकाळी त्राससंबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

नरेश डोंगरे !

नागपूर : अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात. अत्यंत गंभीर असा हा प्रकार अनेकांसाठी प्रचंड मनस्तापाचा विषय ठरला आहे. मात्र, हा सर्व प्रकार लक्षात येऊनही त्याकडे संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

अजनीचा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोक्याचा आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहने जाऊ नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरावर लोखंडी पोल रोवण्यात आले. कार, जीप व अशीच लाईट वेट वाहने त्या पोलमधून जातील, अशी ही व्यवस्था आहे. मात्र, या व्यवस्थेने रोज हजारो नागरिकांचा त्रास वाढवला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला शाळा, महाविद्यालय आहे. एका बाजूला रेल्वेस्थानक तसेच अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये तर दुसऱ्या बाजूला मेडिकल आणि विविध कार्यालये आहेत. त्यामुळे रोज सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजतापासून वाहनचालकांची प्रचंड वर्दळ असते. सकाळी ही वर्दळ लवकर संपत असली तरी सायंकाळी मात्र रात्री ९ ते १० वाजेपर्यंत पुलावर आणि पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहने मुंगीच्या गतीने सरकतात. त्यामुळे महत्त्वाचे काम करण्यासाठी निघालेल्यांना या कोंडीत अडकून पडल्यामुळे प्रचंड त्रास होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार रोजचाच झाला आहे.

पोलिसांच्या नियंत्रणाबाहेरची स्थिती

विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये दूरदूरवरून अनेक अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांना घेऊन दिवसभरात शंभरावर रुग्णवाहिका येतात. सायंकाळी अनेक रुग्णवाहिका वाहनांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी येथे ट्रॅफिक पोलीस असतात. मात्र, टी-पॉईंट असलेल्या या पुलावर वाहनांची संख्या एवढी मोठी असते की स्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हा प्रकार फारच वेदनादायी ठरला आहे.

मोठा धोका होण्याची भीती

जड वाहनांच्या वजनामुळे पुलावर धोका होण्याची भीती असल्याने महापालिकेने येथे ही उपाययोजना केली असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. मात्र, अनेक छोट्या-मोठ्या, कार, जीप, दुचाकी आणि अशीच काही वाहने एकाच वेळी या पुलावर जमा होऊन रेंगाळत असल्याने त्यांच्या वजनाने या पुलावर एखाद वेळी मोठा धोका होऊ शकतो. संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात हा धोका वारंवार येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दुर्घटना घडल्यावरच संबंधित प्रशासन याबाबत उपाययोजना करेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

----

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी