शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

अजब प्रेम की खतम कहानी!

By admin | Updated: June 4, 2016 02:48 IST

कानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे.

जीवाच्या धाकाने गाव सोडले : जीव दिला, जीव घेतला नरेश डोंगरे  नागपूरकानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे. पाच वर्षांपूर्वी त्याची कुणकुण दोघांच्याही घरच्यांना लागली होती. अर्थात्च तीव्र विरोध, भांडणे आणि दोन गटात हाणामारी देखील झाली. दोघांनाही घरच्यांकडून ‘काट डालेंगे’अशी धमकी मिळाली. मात्र, पे्रमवीर कुठे धमक्यांना भीक घालतात? निशा अन् सरवरही कुणाला भीत नव्हते. दोघांच्या घरच्यांकडून त्यांच्या हालचालीवर डोळा असतानाही त्यांच्यातील दुरावा कमी झाला नाही. सारखे दडपण, मारहाण, धमक्या मिळत असल्याने त्यांनी अखेर तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडून तीव्र विरोध झाल्याने जीवाच्या भीतीने आणि एकत्र राहण्याच्या उत्कटतेने निशा आणि सरवर यांनी २०१३ मध्ये कानपुरातून पळ काढला. काही दिवस इकडच्या तिकडच्या नातेवाईकांकडे राहिले. घरची मंडळी रागाने बेभान झाली होती. मिळेल तेथे कापून काढू, अशी भाषा कानावर पडत असल्याने जीवाच्या धाकाने हे दोघे तीन वर्षांपूर्वी नागपुरात आले. मोमीनपुऱ्यातील टिमकी भागात त्यांनी एका इमारतीत भाड्याच्या खोलीत संसार थाटला. कपड्यांवर कलाकुसर करणारा सरवर सनकी तर, मनिषा तापट अन् एकलकोंड्या स्वभावाची होती. ती अलीकडे पतीशी थोड्याथोड्या कारणावरून वाद घालायची. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. मात्र, ते शेजाऱ्यांकडे आपले कधीच गाऱ्हाणे मांडत नव्हते. कुणाशी फारसे बोलतही नव्हते. ते आणि त्यांच्यासोबतचा चिमुकला दादू एवढेच त्यांचे नागपुरातील विश्व! त्यामुळे शेजारची मंडळीही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हती. ते दोघे भिन्न धर्मिय असावे, अशी खात्री एकूणच वर्तनातून बाजूच्यांना पटली होती. त्यांचे प्रेमप्रकरण असावे आणि जीवाच्या धाकाने ते बाहेरगावाहून पळून आले असावे, असाही तर्क शेजाऱ्यांनी काढला होता. तो खराही होता. (प्रतिनिधी)रजिस्टरवर उतरवल्या वेदनानिशा आणि सरवरने जातीधर्माच्या बेड्या तोडल्या होत्या. कुटुंबीयांचीही बंधने झुगारली होती. नागपुरात असे एकाकी जीवन जगण्यासाठी ते घरच्यांना दोष द्यायचे. त्यांच्याकडून होणारा त्रास किती क्लेषदायक आहे, ते एका रजिस्टरवर लिहायचे. घरच्यांमुळे आपले जगणे किती कठीण झाले, त्या वेदना हे दोघे शब्दबद्ध करीत होते. त्यांनी गेल्या तीन वर्षात आपल्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती रजिस्टरच्या तब्बल ४० पानांवर उतरवली होती. नाहकच गेला दादूचा बळीया प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे, दादू हा निशा आणि सरवरचा मुलगा नव्हे. तो निशाची कानपुरात राहणारी बहीण अनिताचा मुलगा आहे. निशाचा दादूवर खूप जीव होता. त्यामुळे घरून पळून येताना तिने दादूलाही सोबत आणले होते. प्रेमासाठी कडाडून होणारा विरोध सहन करणाऱ्या दोघांनी आपले घर, गाव, नातेवाईक सोडले. आता जगणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने जीवही सोडला. मात्र, निरागस दादूचा त्यांनी नाहक जीव घेतला. त्याचा कसलाही दोष नसताना तो या ‘अजब प्रेम की खतम कहानी‘चा बळी ठरला.