शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अजब प्रेम की खतम कहानी!

By admin | Updated: June 4, 2016 02:48 IST

कानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे.

जीवाच्या धाकाने गाव सोडले : जीव दिला, जीव घेतला नरेश डोंगरे  नागपूरकानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे. पाच वर्षांपूर्वी त्याची कुणकुण दोघांच्याही घरच्यांना लागली होती. अर्थात्च तीव्र विरोध, भांडणे आणि दोन गटात हाणामारी देखील झाली. दोघांनाही घरच्यांकडून ‘काट डालेंगे’अशी धमकी मिळाली. मात्र, पे्रमवीर कुठे धमक्यांना भीक घालतात? निशा अन् सरवरही कुणाला भीत नव्हते. दोघांच्या घरच्यांकडून त्यांच्या हालचालीवर डोळा असतानाही त्यांच्यातील दुरावा कमी झाला नाही. सारखे दडपण, मारहाण, धमक्या मिळत असल्याने त्यांनी अखेर तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडून तीव्र विरोध झाल्याने जीवाच्या भीतीने आणि एकत्र राहण्याच्या उत्कटतेने निशा आणि सरवर यांनी २०१३ मध्ये कानपुरातून पळ काढला. काही दिवस इकडच्या तिकडच्या नातेवाईकांकडे राहिले. घरची मंडळी रागाने बेभान झाली होती. मिळेल तेथे कापून काढू, अशी भाषा कानावर पडत असल्याने जीवाच्या धाकाने हे दोघे तीन वर्षांपूर्वी नागपुरात आले. मोमीनपुऱ्यातील टिमकी भागात त्यांनी एका इमारतीत भाड्याच्या खोलीत संसार थाटला. कपड्यांवर कलाकुसर करणारा सरवर सनकी तर, मनिषा तापट अन् एकलकोंड्या स्वभावाची होती. ती अलीकडे पतीशी थोड्याथोड्या कारणावरून वाद घालायची. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. मात्र, ते शेजाऱ्यांकडे आपले कधीच गाऱ्हाणे मांडत नव्हते. कुणाशी फारसे बोलतही नव्हते. ते आणि त्यांच्यासोबतचा चिमुकला दादू एवढेच त्यांचे नागपुरातील विश्व! त्यामुळे शेजारची मंडळीही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हती. ते दोघे भिन्न धर्मिय असावे, अशी खात्री एकूणच वर्तनातून बाजूच्यांना पटली होती. त्यांचे प्रेमप्रकरण असावे आणि जीवाच्या धाकाने ते बाहेरगावाहून पळून आले असावे, असाही तर्क शेजाऱ्यांनी काढला होता. तो खराही होता. (प्रतिनिधी)रजिस्टरवर उतरवल्या वेदनानिशा आणि सरवरने जातीधर्माच्या बेड्या तोडल्या होत्या. कुटुंबीयांचीही बंधने झुगारली होती. नागपुरात असे एकाकी जीवन जगण्यासाठी ते घरच्यांना दोष द्यायचे. त्यांच्याकडून होणारा त्रास किती क्लेषदायक आहे, ते एका रजिस्टरवर लिहायचे. घरच्यांमुळे आपले जगणे किती कठीण झाले, त्या वेदना हे दोघे शब्दबद्ध करीत होते. त्यांनी गेल्या तीन वर्षात आपल्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती रजिस्टरच्या तब्बल ४० पानांवर उतरवली होती. नाहकच गेला दादूचा बळीया प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे, दादू हा निशा आणि सरवरचा मुलगा नव्हे. तो निशाची कानपुरात राहणारी बहीण अनिताचा मुलगा आहे. निशाचा दादूवर खूप जीव होता. त्यामुळे घरून पळून येताना तिने दादूलाही सोबत आणले होते. प्रेमासाठी कडाडून होणारा विरोध सहन करणाऱ्या दोघांनी आपले घर, गाव, नातेवाईक सोडले. आता जगणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने जीवही सोडला. मात्र, निरागस दादूचा त्यांनी नाहक जीव घेतला. त्याचा कसलाही दोष नसताना तो या ‘अजब प्रेम की खतम कहानी‘चा बळी ठरला.