शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

रेल्वे स्थानकावर स्वच्छ भारत मिशनची ऐशीतैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:08 IST

नागपूर : रेल्वे स्थानकावर सफाईचे कंत्राट संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. केवळ कोटेशनवर २० सफाई कर्मचारी संपूर्ण रेल्वे ...

नागपूर : रेल्वे स्थानकावर सफाईचे कंत्राट संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. केवळ कोटेशनवर २० सफाई कर्मचारी संपूर्ण रेल्वे स्थानकाचा भार सांभाळत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने सफाईच्या कंत्राटाचे नूतनीकरण करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

नागपूर रेल्वे स्थानकावर सफाईचे कंत्राट खासगी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले होते, परंतु हे कंत्राट ३१ मे, २०२१ रोजी संपल्यामुळे रेल्वे स्थानकावर तीन पाळीत काम करणाऱ्या ८० सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद झाले. रेल्वे स्थानकाची सफाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रेयांक ट्रेडर्स नावाच्या कंपनीला कोटेशनवर काम दिले. सध्या या कंपनीचे २० सफाई कर्मचारी रेल्वे स्थानकावर सफाईचे काम पाहत आहेत, परंतु रेल्वे स्थानकाचा व्याप पाहता, हे सफाई कर्मचारी पुरेसे नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. रेल्वे रुळावर प्रवाशांनी टाकलेले केळाची टरफले, भोजनाची पाकिटे, इतर कचरा साचून असल्यामुळे हा कचरा सडत असून, त्याची दुर्गंधी पसरत आहे. यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रेल्वे प्रशासनाने नागपूर विभागात स्वच्छता पंधरवडा पाळला होता. त्यानुसार, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅटफार्म, रेल्वे रुळाची स्वच्छता, प्लॅटफार्मवरील शौचालय, रेल्वेचे विविध विभाग आणि पेंट्रीकारमधील स्वच्छता आदींची पाहणी केली होती, परंतु त्यानंतर रेल्वे प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडल्याचे सध्याच्या रेल्वे स्थानकावरील परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित सफाईचे कंत्राट देऊन रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

..............

८० सफाई कर्मचारी पडत होते कमी

रेल्वे स्थानकावर सफाईचे कंत्राट सुरू असताना ८० सफाई कर्मचारी तीन पाळीत काम करीत होते. हे सफाई कर्मचारीही स्वच्छतेच्या कामात कमी पडत होते, परंतु आता २० कर्मचाऱ्यांच्या भरवशावर रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेचा भार आल्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानकाची स्वच्छता सांभाळणे त्यांना कठीण होत आहे. त्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

रेल्वे रुळाशेजारील नाल्याही तुंबल्या

रेल्वेने जाणारे प्रवासी आपल्याजवळील केळ्याची साले, भोजनाची पाकिटे, पाण्याच्या बॉटल्स या रुळाच्या शेजारील नालीत टाकत आहेत. त्यामुळे रुळाच्या शेजारील नाल्या तुंबल्याची स्थिती आहे. रेल्वे रुळाशेजारील नाल्यातून घाण पाणी वाहते, परंतु या नाल्याच तुंबल्यामुळे घाण पाणी जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.

.............