शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विमानतळाचा लूक बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कॅबिनेटच्या बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेला एप्रिल-२०१८ पर्यंत वेळ लागणार आहे. खासगीकरणानंतर संबंधित कंपनीची भागीदारी ७४ टक्के अणि मिहान इंडिया लिमिटेडची भागीदारी २६ टक्के राहणार आहे. चार वर्षांत १,९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विमानतळाला आंतराष्ट्रीय लूक येणार आहे.पाच ...

ठळक मुद्देकॅबिनेटच्या मंजुरीनंतर अडथळे दूर : विकासाला मिळेल गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कॅबिनेटच्या बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेला एप्रिल-२०१८ पर्यंत वेळ लागणार आहे. खासगीकरणानंतर संबंधित कंपनीची भागीदारी ७४ टक्के अणि मिहान इंडिया लिमिटेडची भागीदारी २६ टक्के राहणार आहे. चार वर्षांत १,९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विमानतळाला आंतराष्ट्रीय लूक येणार आहे.पाच कंपन्यांच्या निविदा पात्रखासगीकरणाची निविदा मागील वर्षी निघाली. विमानतळाच्या खासगीकरणासाठी पाच कंपन्या पात्र ठरल्या. यामध्ये टाटा रिअ‍ॅलिटी, अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, जीएमआर एअरपोर्ट लि., जीव्हीके, पीएनबी इन्फ्राटेक, एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या कंपन्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) खासगी कंपन्यांकडून विमानतळ विकासासाठी नेमक्या आर्थिक खर्चाचा प्रस्ताव अर्थात रिक्वेस्ट फॉर प्रपोजल मागविण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये निविदा आणि त्यानंतर तीन ते चार महिन्यात खासगी कंपन्यांकडून तीन ते चार प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. जी कंपनी जास्त महसूल देईल, त्या कंपनीकडे खासगीकरणाचे काम सोपविण्यात येणार आहे.चार टप्प्यात विकासविमानतळाचा विकास एकूण चार टप्प्यात एकूण १९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १,४२० कोटी, दुसºया टप्प्यात २१० कोटी, तिसºया टप्प्यात २३४ कोटी आणि चौथ्या टप्प्यात ११८ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून नवीन टर्मिनल व कार्गो क्षेत्र, टॅक्सी-वे, एअरोब्रीज, नवीन धावपट्टी आणि अन्य कामे करण्यात येणार आहे.विमानतळावर नवीन पार्किंग जागासध्या विमानतळावर १७ विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. खासगीकरणानंतर १६ पार्किंग जागा नव्याने उभारण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विमान सेवा सुरू होण्यासाठी कंपनीला नव्याने पार्किंग जागा तयार करावी लागणार आहे. खासगीकरणानंतर विमानतळावर मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आदी सेवा उपलब्ध होईल. ही सुविधा महसूल वाढीसाठी पहिल्याच टप्प्यात कंपनीला उपलब्ध करून द्यावी लागेल.विमानतळाला दरवर्षी तोटाविमानतळाचे संचालन करणाºया मिहान इंडिया लिमिटेडला (५१ टक्के वाटा) दरवर्षी ५६ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. मर्यादित विमान सेवा आणि कार्गो सुविधा नसल्यामुळे एवढा तोटा सहन करावा लागत आहे. विमान सेवांचा विस्तार झाल्यानंतर तोटा भरून निघण्याची शक्यता आहे.