शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचा लूक बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कॅबिनेटच्या बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेला एप्रिल-२०१८ पर्यंत वेळ लागणार आहे. खासगीकरणानंतर संबंधित कंपनीची भागीदारी ७४ टक्के अणि मिहान इंडिया लिमिटेडची भागीदारी २६ टक्के राहणार आहे. चार वर्षांत १,९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विमानतळाला आंतराष्ट्रीय लूक येणार आहे.पाच ...

ठळक मुद्देकॅबिनेटच्या मंजुरीनंतर अडथळे दूर : विकासाला मिळेल गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कॅबिनेटच्या बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेला एप्रिल-२०१८ पर्यंत वेळ लागणार आहे. खासगीकरणानंतर संबंधित कंपनीची भागीदारी ७४ टक्के अणि मिहान इंडिया लिमिटेडची भागीदारी २६ टक्के राहणार आहे. चार वर्षांत १,९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विमानतळाला आंतराष्ट्रीय लूक येणार आहे.पाच कंपन्यांच्या निविदा पात्रखासगीकरणाची निविदा मागील वर्षी निघाली. विमानतळाच्या खासगीकरणासाठी पाच कंपन्या पात्र ठरल्या. यामध्ये टाटा रिअ‍ॅलिटी, अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, जीएमआर एअरपोर्ट लि., जीव्हीके, पीएनबी इन्फ्राटेक, एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या कंपन्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) खासगी कंपन्यांकडून विमानतळ विकासासाठी नेमक्या आर्थिक खर्चाचा प्रस्ताव अर्थात रिक्वेस्ट फॉर प्रपोजल मागविण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये निविदा आणि त्यानंतर तीन ते चार महिन्यात खासगी कंपन्यांकडून तीन ते चार प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. जी कंपनी जास्त महसूल देईल, त्या कंपनीकडे खासगीकरणाचे काम सोपविण्यात येणार आहे.चार टप्प्यात विकासविमानतळाचा विकास एकूण चार टप्प्यात एकूण १९८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १,४२० कोटी, दुसºया टप्प्यात २१० कोटी, तिसºया टप्प्यात २३४ कोटी आणि चौथ्या टप्प्यात ११८ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून नवीन टर्मिनल व कार्गो क्षेत्र, टॅक्सी-वे, एअरोब्रीज, नवीन धावपट्टी आणि अन्य कामे करण्यात येणार आहे.विमानतळावर नवीन पार्किंग जागासध्या विमानतळावर १७ विमानांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. खासगीकरणानंतर १६ पार्किंग जागा नव्याने उभारण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विमान सेवा सुरू होण्यासाठी कंपनीला नव्याने पार्किंग जागा तयार करावी लागणार आहे. खासगीकरणानंतर विमानतळावर मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आदी सेवा उपलब्ध होईल. ही सुविधा महसूल वाढीसाठी पहिल्याच टप्प्यात कंपनीला उपलब्ध करून द्यावी लागेल.विमानतळाला दरवर्षी तोटाविमानतळाचे संचालन करणाºया मिहान इंडिया लिमिटेडला (५१ टक्के वाटा) दरवर्षी ५६ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. मर्यादित विमान सेवा आणि कार्गो सुविधा नसल्यामुळे एवढा तोटा सहन करावा लागत आहे. विमान सेवांचा विस्तार झाल्यानंतर तोटा भरून निघण्याची शक्यता आहे.