शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

आकाशवाणीने दिली ओळख

By admin | Updated: October 6, 2015 04:28 IST

देशभरात लाखो उद्घोषक आहेत. मात्र त्यात मला जे स्थान मिळाले, लोकप्रियता मिळाली, ती केवळ आकाशवाणीमुळे.

मैत्री परिवार संस्थेतर्फे आयोजन : किशनजी शर्मा यांचे प्रतिपादन नागपूर : देशभरात लाखो उद्घोषक आहेत. मात्र त्यात मला जे स्थान मिळाले, लोकप्रियता मिळाली, ती केवळ आकाशवाणीमुळे. आकाशवाणीने मला त्या सर्वांपेक्षा वेगळी ओळख दिली, असे प्रतिपादन आकाशवाणीचे प्रसिद्ध उद्घोषक किशनजी शर्मा यांनी केले. मैत्री परिवार संस्थेतर्फे ‘गीतों की बात किशनजी के साथ’ या संगीत मैफलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. बजाजनगर चौकातील ‘विष्णूजी की रसोई’ येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी व कुंदाताई विजयकर यांच्या हस्ते शर्मा यांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशनजी शर्मा यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा देत, ‘गुंज उठी शहनाई’या चित्रपटातील त्यांच्या शहनाईच्या जादूचा किस्सा सांगितला. तसेच अशोक कुमार यांचे नागपूरशी जुळलेले नाते व त्यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाची माहिती दिली. यानंतर सुरू झालेल्या संगीत मैफिलीत ते प्रत्येक गाण्यापूर्वी त्या गाण्यामागील विशेष पार्श्वभूमी आपल्या खास शैलीत श्रोत्यांपुढे सादर करीत होते. यामुळे या संगीत मैफिलीला काही वेगळाच रंग चढला होता. कार्यक्रमाला डॉ. पीयूषकुमार, प्रा. संजय भेंडे, विष्णू मनोहर व मंजुषा पांढरीपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद पेंडके यांनी केले. संचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी करून विजय जथे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तेरे सुर और मेरे गीत...४प्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांनी ‘तेरे सुर और मेरे गीत...’ या लोकप्रिय गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘तूम मुझे भुल भी जाओ..’, ‘चैन से हमको कभी...’, ‘सुन सायबा सुन..’, ‘ये रात भीगी भीगी..’, ‘तोरा मन दर्पण..’, ‘दील दीवाना बीन सजना के..’, ही गाणी सादर केली. तसेच गायक अमर कुलकर्णी यांनी ‘उपर गगन विशाल...’, ‘कभी कभी मेरे दिल मे...’ व ‘गीत नया गाता हु...’ अशा गीतांसह सारंग जोशी यांनी ‘चलो एक बार फीरसे...’, ‘मधुबन मे राधिका...’, ‘आपके हसीन रुख पे...’, ‘दिल दीवाना बीन सजना के..’अशा गीतांनी ही मैफील सजविली होती. या मैफिलीदरम्यान विष्णू मनोहर यांनी अटलजींच्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमात वादक म्हणून सचिन ढोमणे, उज्ज्वला गोकर्ण, अमर शेंडे, गोविंद गडीकर, सलील मुळे व नंदु गोहाने यांनी साथ दिली. तर ध्वनी पराग फुसे व इकबाल भाई यांनी मंच सजावट केली होती.