शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

हवी शुद्ध हवा!

By admin | Updated: June 5, 2014 01:08 IST

पर्यावरणात सभोवतालचा परिसर, हवा, पाणी, माती आणि जीवसृष्टीचा त्यात अंतर्भाव होतो. या सर्वांंंचा एकमेकांवर व मनुष्य जीवनावरही होणारा परिणाम म्हणजे पर्यावरण.

पर्यावरण म्हणजे कायपर्यावरणात सभोवतालचा परिसर, हवा, पाणी, माती आणि जीवसृष्टीचा त्यात अंतर्भाव होतो. या सर्वांंंचा एकमेकांवर व मनुष्य जीवनावरही होणारा  परिणाम म्हणजे पर्यावरण.वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे वायू प्रदूषणाचेही प्रश्न मोठय़ा शहरात निर्माण झाले आहेत. शहरातील काही भागातील हवा पोषक  असली तरी काही भागात मात्र तिच्यापासून धोका होण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहराच्या विविध भागात केलेल्या तपासणीतून हे  चित्र पुढे आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ठराविक कालावधीत शहरातील काही भागात तपासणी केली जाते. यंदाही विविध कालावधीत  सिव्हिल लाईन्स, उत्तर अंबाझरी मार्ग, हिंगणा मार्ग आणि  सदर भागातील काही निवासी भागात तपासणी करण्यात आली. सिव्हिल लाईन्सचा भाग  वगळता इतर भागात हवेत काही घटक प्रमाणाबाहेर आढळून आले आहेत. सिव्हिल लाईन्समध्ये आठवड्यातून सहा दिवस याप्रमाणे ५ ते ३१  मेदरम्यान एकूण २३ दिवस तपासणी करण्यात आली. त्यात  मंडळाने ठरवून दिलेल्या प्रमाणातच चाचणीचे निष्कर्ष  होते. त्यातुलनेत हिंगणा  मार्गावरील स्थिती उलट होती. ५ एप्रिल ते ३0 एप्रिल या दरम्यान औद्योगिक वसाहती जवळील काही भागातील एकूण आठ दिवस हवेची तपासणी  करण्यात आली. उत्तर अंबाझरी मार्गावर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या  टेरेसवर चाचणी  घेण्यात आली.  या काळात काही दिवसांचे निष्कर्ष हे  समाधानकारक तर काही दिवसांचे निष्कर्ष हे  प्रमाणा बाहेर आढळून आले. हिंगणा मार्गावर औद्योगिक वसाहत असल्याने त्याचा परिणाम होतो. त्या  तुलनेत सिव्हिल लाईन्समध्ये हिरवळ अधिक आहे. शासकीय कार्यालये असल्याने मोकळी जागाही मोठय़ा प्रमामात आहे. त्यामुळे या भागात वायू  प्रदूषणाची शक्यता कमी असल्याचा अंदाज आहे. असे असले तरी ३५ लाखाच्या या शहरात नागरीकरण वाढतच राहिले तर शुद्ध हवेसाठी जागेची  शोधाशोधच करावी लागणार आहे.औद्योगिक प्रदूषणात विदर्भ आघाडीवरपुढील काही वर्षांंंंत प्रदूषणात विदर्भ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आघाडीवर राहण्याची चिन्हे आहेत. विदर्भात होऊ घातलेल्या १३२ ऊर्जा  प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. नियोजन न केल्यास वायू आणि जल प्रदूषणाचा स्तर वाढण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त  केली.विदर्भातील १३२ प्रकल्पांतून ८६ हजार मेगावॅट वीज निíमती होईल. सध्या १0 हजार मेगावॅटचे उत्पादन सुरू आहे. या प्रकल्पातील राख हवेत आणि  पाण्यात मिसळल्याने जनतेला गंभीर आजाराला सामोरे जावे लागेल, शिवाय या प्रकल्पातील पाणी तलाव आणि नद्यांमध्ये गेल्यास त्यातील जीवजंतू  मरतील आणि लोकांना दूषित पाणी मिळेल, असा पर्यावरण तज्ज्ञांचा अहवाल आहे. पर्यावरण तज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी सांगितले की,  ऊर्जा प्रकल्पातून निघणारे २.५ मायक्रॉन इतक्या छोट्या घटकांना प्रदूषण मंडळाची उपकरणेही  पकडत नाहीत. हे घटक श्‍वासाद्वारे मानवाच्या शरीरात जातात. त्यामुळे फुफ्फुस व हृदयाचे आणि कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात.  डिसेंबर २0१३ च्या नागपूर अधिवेशनात नागपूर कॅन्सरची राजधानी होईल, असा अहवाल सादर करण्यात आला होता. रस्त्यांवरील डिझेल  वाहनांचीही हीच स्थिती आहे. याशिवाय १0 मायक्रॉनचे जड घटक जमीन आणि तलावातील पाण्यावर बसतात. अन्य स्वरूपात जनावरे तर पाण्यात  मासे त्याचे सेवन करतात, शिवाय पाणी जनतेच्या पिण्यासाठी वापरले जाते. कोराडीचे प्रदूषित पाणी कन्हान नदीत तर चंद्रपूरचे पाणी इराई नदीत  सोडले जाते. काही प्रकल्पाचे पाणी पुढे वैनगंगा नदीतही जाईल. नागपुरातील सांडपाणी गोसेखुर्दला जाऊन मिळते. वायूप्रमाणे जल शुद्धीकरण हे  महत्त्वाचे आहे.  हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. यावर्षी पाऊस कमी होण्याचा संकेत आहे. विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांमुळे तापमान वाढेल.  अंबाझरी  तलावाचे पाणी दूषित झाले आहे. या तलावात वाडी, दत्तवाडी येथील सांडपाणी आणि हिंगणा एमआयडीसी येथील प्रदूषित पाणी सोडले जाते. तेच  पाणी प्रक्रियेविना सीआरपीएफ व एमआयडीसी येथील लोकांना पिण्यासाठी दिले जाते. गोरेवाडा तलावात एनआयटी ले-आऊटमधील सांडपाणी  प्रक्रियेविना सोडले जाते. यावर निर्बंंंंध हवे. नागपुरातून दररोज जवळपास ७00 टन कचरा निघतो. त्यात १00 टन जैविक असतो. हा कचरा  प्रक्रियेविना भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये ठेवला जातो. तो कचरा कुजल्याने त्यातून कार्बनडाय ऑक्साईडपेक्षा २७ पट विषारी मिथेन वायू निघतो. तो  ग्लोबल वार्मिंंंंगसाठी घातक आहे. त्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले नागपूरकरांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.