शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

अहो आश्चर्यम्...  'हे' आहे हरियाणातील ‘त्या’ गावाचे वैशिष्ट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:25 IST

Nagpur News hacker मेवात या गावातील दोन डझनपेक्षा जास्त जण एटीएम हॅक करून आतमधील रोकड उडविण्यात सराईत आहेत. एका टोळीचा सूत्रधार इकबाल खान याला परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्या पथकाने नागपुरात आणले.

ठळक मुद्देमेवातमधील दोन डझनपेक्षा जास्त तरुण सक्रियपोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड एटीएम हॅक करून रोकड उडविणे हाच मुख्य धंदा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मेवात या गावातील दोन डझनपेक्षा जास्त जण एटीएम हॅक करून आतमधील रोकड उडविण्यात सराईत आहेत. यांच्यातील एका टोळीचा सूत्रधार इकबाल खान याला परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्या पथकाने ताब्यात घेऊन नागपुरात आणले. त्याच्या चाैकशीतून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

१४ ते १६ जूनच्या दरम्यान नागपुरातील चार ठिकाणचे एटीएम हॅक करून ६.७५ लाख रुपये काढून घेण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास केला. या प्रकरणात पलव, हरियाणा येथील एका व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पथक तिकडे पाठविण्यात आले आणि इकबालखान, अनिस खान तसेच मोहम्मद तालिब यांना अटक करून नागपुरात आणण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता चक्रावून सोडणारी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. त्यानुसार, मेवात या लहानशा गावात ५० पेक्षा जास्त तरुणांनी एटीएम हॅक करून रक्कम उडविण्याचे तंत्र अवगत केल्याचे समजते. अनेक दिवसांपासून त्यांनी हा गोरखधंदा सुरू केला असून, देशातील विविध शहरातून त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपये उडविल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे.

इकबालच्या कथनानुसार, तो मोबाईल टॉवर उभारणीचे काम करीत असताना अवघ्या काही सेकंदात एटीएममधल्या व्यवहाराची नोंद न होऊ देता कॅश डिपॉजिट मशीन (सीडीएम)मधून रक्कम काढून घेण्याचे तंत्र शिकला. या तंत्राचा वापर करून त्याने हरियाणा, राजस्थानमध्ये प्रारंभी रक्कम उडविण्याचे प्रयोग केले. त्यात यश आल्यानंतर त्याने आपली टोळी बनवून देशयात्राच सुरू केली.

अनेक राज्यात हैदोस

इकबाल आणि त्याच्या टोळीने अनेक राज्यात अक्षरश हैदोस घातला आहे. तो आणि त्याच्या टोळीचे सदस्य आधी कोणत्या ठिकाणी सीडीएम आहे, ते बघतात. त्यानंतर तेथून ते रोकड पळवून पुढे निघतात.

इकबाल आणि त्याच्या टोळीने महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबाद, सोलापूरसह अनेक ठिकाणी लाखोंचे हात मारले तर, नाशिक आणि मुंबईत प्रयत्न केले. शिवाय भुवनेश्वर, कटक, मिदनापूर, कोलकाता, कर्नाटक, बिदर, आंध्र प्रदेश आणि विशाखापट्टणम आदी ठिकाणाहूनही या टोळीने लाखोंची रोकडे लंपास केली आहे.

---

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम