शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

कृषी संजीवनी योजना महावितरणच्या घशात

By admin | Updated: July 31, 2014 01:01 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज देयकाच्या रकमेची परतफेड करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने शासनाने ५० टक्के सवलतीची कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. मात्र रिडींग न घेताच शेतकऱ्यांना अवाजवी

राजेश भोजेकर - वर्धाथकबाकीदार शेतकऱ्यांना वीज देयकाच्या रकमेची परतफेड करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने शासनाने ५० टक्के सवलतीची कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. मात्र रिडींग न घेताच शेतकऱ्यांना अवाजवी देयके पाठविली जात असल्यामुळे ही योजनाच सरळ महावितरणच्या घशात चालली आहे. फोटो रिडींगची कामे कंत्राटदारामार्फत केली जात आहेत. ज्या कंत्राटदाराकडे फोटो रिडींगची कामे आहेत, त्यांना घरगुती, व्यावसायिक ग्राहकांसह कृषी पंपाचे मीटर रिंडींगही घेणे अनिवार्य आहे. कृषी पंपाच्या मीटर रिंडींगसाठी शेतात जावे लागते. शेतकऱ्याची शेती शोधावी लागते. हा त्रास नको म्हणून कंत्राटदार कृषी पंपाचे रिंडींगच घेत नाही. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी पंपाची सरासरी देयके पाठविली जात आहेत. ही देयके कुठेही वास्तवाला धरुन नसल्यामुळे शेतकऱ्यांची सर्रास लूट होत आहे. या वीज देयकात कुठेही नेमक्या युनिटचा उल्लेख नसल्याचा फायदा मात्र महावितरण उचलत आहे. या सरासरी देयकात मंजूर भारही वाढविण्यात आला आहे. (उदा.३ एचपीची मोटार असेल तर ५ एचपीचे देयक, ५ एचपीची मोटार असेल तर ७.५ एचपीचे देयक) तसेच साईटवर होणारा रोहित्र दुरुस्ती खर्च आणि वीज गळतीचा भारही शेतकऱ्यांच्या मस्तकी मारला जात आहे. वर्धा जिल्ह्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नैसर्गिक संकटांमुळे दरवर्षी शेती पिकेल, याची शाश्वती राहिलेली नाही. परिणामी बहुतांश कृषी पंपधारक थकबाकीदार झालेले आहेत. सरासरी देयकाच्या नावावर शेतकऱ्यांना अधिकची रक्कम मोजावी लागत असल्यामुळे योजनेचा लाभ होत नाही हे वास्तव आहे.