शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

अमरावती विभागात पाच कीटकनाशकांवर बंदीचे कृषीमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 05:57 IST

जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटनाशकांची पुढील दोन महिन्यासाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी येथे दिली.

नागपूर : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेच्या घटनांची गंभीर दखल घेऊन अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या कीटनाशकांची पुढील दोन महिन्यासाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी येथे दिली.बंदी घालण्यात आलेल्या कीटकनाशकांमध्ये प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सीपरमेथ्रीन ४० टक्के ईसी, फिप्रोनील ४० टक्के अधिक इमीडॅक्लोप्रीड ४० टक्के डब्ल्युजी, असिफेट ७५ टक्के एससी, डीफेन्थीरोन ५० टक्के डब्ल्युपी, मोनोक्रोटोफॉस ३३६ टक्के एसएल आदींचा समावेश आहे. कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या घटनांची दखल घेऊन केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या कालावधीकरिता कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले.>लोकमत इम्पॅक्ट : बुधवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत लोकमतच्या प्रतिनिधीने या विषयाकडे कृषिमंत्र्यांंचे लक्ष वेधत कीटकनाशकांवर बंदी घालणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या आदेशांवर ७ दिवसांपूर्वीच स्वाक्षरी केल्याचे सांगितले होते. परंतु अधिकाऱ्यांनी आदेश काढले नव्हते. तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून आदेश काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुरूवारी बंदीबाबतचे नोटिफिकेशन तातडीने काढण्यात आले, हे विशेष.