शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

कृषी विभागाच्या ‘बीटीएम’वर बडगा!

By admin | Updated: September 26, 2015 02:54 IST

कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेसाठी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पदभरती प्रक्रियेत मोठा घोळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जीवन रामावत नागपूरकृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेसाठी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पदभरती प्रक्रियेत मोठा घोळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्य शासनाने कृषी विभागातील अस्थाई पदभरतीसाठी चंद्रपूर येथील ‘सर्च’ या संस्थेची निवड केली आहे. त्यानुसार या संस्थेने मागील आॅगस्ट महिन्यात विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या सहा जिल्ह्याकरिता एकूण २८२ पदांसाठी जाहिरात प्रकाशित करू न अर्ज मागविले होते. यात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक - ६३ (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक १८९ (एटीएम), संगणक आज्ञावली - ६ व संगणक प्रचालक म्हणून २४ पदांचा समावेश होता. मात्र या जाहिरातीत संस्थेने आपल्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता, शिवाय पत्ताही दिलेला नाही. केवळ ई-मेल व संपर्क क्रमांक देऊन, त्यावर अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार विदर्भातील शेकडो बेरोजगार तरुणांनी वेगवेगळ््या पदांसाठी अर्ज केले.यानंतर संबंधित संस्थेने सर्व उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवर एक संदेश पाठवून एक हजार रुपये रोख किंवा डीडीसह मुलाखतीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार २ ते ५ सप्टेंबरदरम्यान धंतोली परिसरातील हॉटेल ग्रीन सिटीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. यात सुमारे ३५० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मात्र त्या मुलाखतीला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला असताना अजूनपर्यंत अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. उमेदवारांची अंतिम निवड यादी कुठे अडली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, भरती प्रक्रियेत सुरू असलेल्या घोळाचा भांडाफोड झाला. माहिती सूत्रानुसार संबंधित संस्थेने विभागात मंजूर असलेल्या सर्वच २८२ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. परंतु वास्तविक विभागात तेवढी पदेच रिक्त नाहीत. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पूर्वीच्या ९४ लोकांना कमी करू न त्यांच्या जागी नव्याने पदभरती करण्यास स्थगिती दिली आहे. असे असताना संबंधित संस्थेने २८२ पदांसाठी मुलाखती घेऊन बेरोजगार तरुणांची सर्रास दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे. यातच संबंधित संस्थेने ‘आत्मा’ यंत्रणेला कुठेही विश्वासात न घेता ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ‘आत्मा’ यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत, त्याची विभागीय कृषी सहसंचालकांकडे तक्रार केल्याचीही माहिती आहे. यामुळेच कृषी विभागाने अंतिम निवड यादी जाहीर न करता, संस्थेच्या भरती प्रक्रियेला ‘बे्रक’लावला आहे. शिवाय संस्थेकडून आलेल्या यादीची नव्याने छाननी करू न निवड प्रक्रिया राबविण्याचा विचार केला जात आहे. मात्र या संपूर्ण घोळामुळे मुलाखती दिलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे काही उमेदवार संपूर्ण प्रक्रिया रद्द करू न, नव्याने भरती करण्याची मागणी करीत आहे. यासंबंधी कृषी विभागाची बाजू ऐकून घेण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांच्याशी दूरध्वनीवरू न संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही.