शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग पोलिसांच्या रडारवर

By admin | Updated: March 7, 2016 02:35 IST

बोगस ‘शेडनेट-पॉलिहाऊस’प्रकरणी मार्केटिंग कंपन्या आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर आता कृषी विभागातील काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

जीवन रामावत नागपूरबोगस ‘शेडनेट-पॉलिहाऊस’प्रकरणी मार्केटिंग कंपन्या आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर आता कृषी विभागातील काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यानुसार पोलीस लवकरच यातील दोषी अधिकाऱ्यांभोवती चौकशीचा फास आवळणार असल्याचे संकेत मिळाले आहे; शिवाय गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जाणार आहेत. त्यासाठी एक विशेष पथक तयार केले जाणार असल्याची माहिती कुही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.सध्या पोलीस कारवाईच्या भीतीने दोषी कृषी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. शिवाय शनिवारपर्यंत गुप्त बैठका घेऊन कृषी विभागातील माहिती बाहेर पुरविणाऱ्यांचा शोध घेण्याची भाषा बोलणारे अधिकारी अचानक ‘सायलन्ट मोड’वर गेले आहेत. दुसरीकडे शेतकरी समाधान व्यक्त करू लागले आहे. मागील दोन-अडीच वर्षांपासून सतत पाठपुरावा करून त्यांच्या तक्रारींची कुणीही दखल घेत नव्हते.शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक नागपूर : काहीच दिवसांत उमरेड तालुक्यातील तितूर येथील मंगेश जपुलकर यांच्यासह लोकनाथ गजेंद्र या शेतकऱ्यांच्या तक्रारींवर अंबाझरी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या सहकार्याने शेतकऱ्यांना नवे बळ मिळाले आहे. या मार्केटिंग कंपन्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकच केली नाही तर आधुनिक शेतीच्या नावावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने आतापर्यंत सहा प्रकरणांची चौकशी करून स्वत: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू यांनी त्याबाबतचा संयुक्त चौकशी अहवाल जिल्हाधिकारी आणि कृषी आयुक्तालयाकडे पाठविला आहे. या तक्रारकर्ता शेतकऱ्यांमध्ये सावनेर तालुक्यातील बावनगाव येथील संजय सुरेश सिन्हा, हिंगणा तालुक्यातील पेंढरी येथील शालिनी रामकृष्ण सावरकर, उमरेड तालुक्यातील मांगली येथील केशवराव सदाशिव पार्डीकर, पारशिवनी तालुक्यातील महादुला येथील लोकनाथ गजेंद्र, कुही तालुक्यातील तितूर येथील मोतीराम पांडुरंग जपुलकर व याच कुही तालुक्यातील अडम येथील रत्नाकर रामूजी भजनकर यांचा समावेश आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे कृषी विभागाने चौकशी केलेल्या या सर्व प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक झाली असल्याचे खुद्द कृषी अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मात्र असे असताना आतापर्यंत केवळ दोनच प्रकरणात गुन्हा दाखल असून, इतर सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत. (प्रतिनिधी)