शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

कृषी विभाग पोलिसांच्या रडारवर

By admin | Updated: March 7, 2016 02:35 IST

बोगस ‘शेडनेट-पॉलिहाऊस’प्रकरणी मार्केटिंग कंपन्या आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर आता कृषी विभागातील काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

जीवन रामावत नागपूरबोगस ‘शेडनेट-पॉलिहाऊस’प्रकरणी मार्केटिंग कंपन्या आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर आता कृषी विभागातील काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यानुसार पोलीस लवकरच यातील दोषी अधिकाऱ्यांभोवती चौकशीचा फास आवळणार असल्याचे संकेत मिळाले आहे; शिवाय गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जाणार आहेत. त्यासाठी एक विशेष पथक तयार केले जाणार असल्याची माहिती कुही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.सध्या पोलीस कारवाईच्या भीतीने दोषी कृषी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. शिवाय शनिवारपर्यंत गुप्त बैठका घेऊन कृषी विभागातील माहिती बाहेर पुरविणाऱ्यांचा शोध घेण्याची भाषा बोलणारे अधिकारी अचानक ‘सायलन्ट मोड’वर गेले आहेत. दुसरीकडे शेतकरी समाधान व्यक्त करू लागले आहे. मागील दोन-अडीच वर्षांपासून सतत पाठपुरावा करून त्यांच्या तक्रारींची कुणीही दखल घेत नव्हते.शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक नागपूर : काहीच दिवसांत उमरेड तालुक्यातील तितूर येथील मंगेश जपुलकर यांच्यासह लोकनाथ गजेंद्र या शेतकऱ्यांच्या तक्रारींवर अंबाझरी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या सहकार्याने शेतकऱ्यांना नवे बळ मिळाले आहे. या मार्केटिंग कंपन्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकच केली नाही तर आधुनिक शेतीच्या नावावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने आतापर्यंत सहा प्रकरणांची चौकशी करून स्वत: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू यांनी त्याबाबतचा संयुक्त चौकशी अहवाल जिल्हाधिकारी आणि कृषी आयुक्तालयाकडे पाठविला आहे. या तक्रारकर्ता शेतकऱ्यांमध्ये सावनेर तालुक्यातील बावनगाव येथील संजय सुरेश सिन्हा, हिंगणा तालुक्यातील पेंढरी येथील शालिनी रामकृष्ण सावरकर, उमरेड तालुक्यातील मांगली येथील केशवराव सदाशिव पार्डीकर, पारशिवनी तालुक्यातील महादुला येथील लोकनाथ गजेंद्र, कुही तालुक्यातील तितूर येथील मोतीराम पांडुरंग जपुलकर व याच कुही तालुक्यातील अडम येथील रत्नाकर रामूजी भजनकर यांचा समावेश आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे कृषी विभागाने चौकशी केलेल्या या सर्व प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक झाली असल्याचे खुद्द कृषी अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मात्र असे असताना आतापर्यंत केवळ दोनच प्रकरणात गुन्हा दाखल असून, इतर सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत. (प्रतिनिधी)