शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कृषी विद्यापीठांना बार्टी फेलोशिपमधून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:09 IST

उदय अंधारे नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)ने यावर्षी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

उदय अंधारे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)ने यावर्षी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपमधून वगळले आहे. या विद्यापीठांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कृषी विद्यापीठांमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांत रोष निर्माण झाला आहे.

बार्टीतर्फे २०१३ मध्ये ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. राज्यातील रहिवासी आणि विविध विद्यापीठांमधील तांत्रिक अभ्यासक्रमात पीएच.डी. करीत असलेले अनुसूचित जातीचे विद्यार्थी या फेलोशिपकरिता पात्र आहेत. बार्टीने गेल्या जानेवारीत जाहिरात प्रकाशित करून ज्युनियर व सिनियर रिसर्च फेलोशिपकरिता अर्ज मागवले आहेत. परंतु, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कद्वारे जाहीर पहिल्या सर्वोत्तम १०० संस्थांमध्ये समावेश नसल्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या फेलोशिपमधून वगळण्यात आले आहे. असे करताना कृषी विद्यापीठे इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चद्वारे नियंत्रित केली जातात आणि कौन्सिल त्यांची स्वतंत्र रँकिंग जाहीर करते, या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

अ‍ॅग्रीकल्चरल डॉक्टरेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रोहित चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ९ मार्च रोजी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. गजभिये यांनी कृषी विद्यापीठांचा फेलोशिप कार्यक्रमात समावेश करण्याची ग्वाही दिली होती, परंतु पुढे काहीच झाले नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी गजभिये यांना मोबाईलवर कॉल केला असता, त्यांनी कॉल स्वीकारला नाही.

---------------

यावर्षी केवळ २३ पीएच.डी. विद्यार्थी

यावर्षी बार्टीने १०६ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे जाहीर केले आहे. त्यातुलनेत कृषी विद्यापीठातील अनुसूचित जातीचे केवळ २३ विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. २०१८ मध्ये समान फेलोशिपकरिता ४०८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यावेळी प्रवेश परीक्षा न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. करिता नोंदणी केली होती.