शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

कृषी विद्यापीठांना बार्टी फेलोशिपमधून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:09 IST

उदय अंधारे नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)ने यावर्षी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

उदय अंधारे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)ने यावर्षी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपमधून वगळले आहे. या विद्यापीठांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कृषी विद्यापीठांमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांत रोष निर्माण झाला आहे.

बार्टीतर्फे २०१३ मध्ये ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. राज्यातील रहिवासी आणि विविध विद्यापीठांमधील तांत्रिक अभ्यासक्रमात पीएच.डी. करीत असलेले अनुसूचित जातीचे विद्यार्थी या फेलोशिपकरिता पात्र आहेत. बार्टीने गेल्या जानेवारीत जाहिरात प्रकाशित करून ज्युनियर व सिनियर रिसर्च फेलोशिपकरिता अर्ज मागवले आहेत. परंतु, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कद्वारे जाहीर पहिल्या सर्वोत्तम १०० संस्थांमध्ये समावेश नसल्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या फेलोशिपमधून वगळण्यात आले आहे. असे करताना कृषी विद्यापीठे इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चद्वारे नियंत्रित केली जातात आणि कौन्सिल त्यांची स्वतंत्र रँकिंग जाहीर करते, या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

अ‍ॅग्रीकल्चरल डॉक्टरेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रोहित चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ९ मार्च रोजी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. गजभिये यांनी कृषी विद्यापीठांचा फेलोशिप कार्यक्रमात समावेश करण्याची ग्वाही दिली होती, परंतु पुढे काहीच झाले नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी गजभिये यांना मोबाईलवर कॉल केला असता, त्यांनी कॉल स्वीकारला नाही.

---------------

यावर्षी केवळ २३ पीएच.डी. विद्यार्थी

यावर्षी बार्टीने १०६ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे जाहीर केले आहे. त्यातुलनेत कृषी विद्यापीठातील अनुसूचित जातीचे केवळ २३ विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. २०१८ मध्ये समान फेलोशिपकरिता ४०८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यावेळी प्रवेश परीक्षा न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. करिता नोंदणी केली होती.