शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

उमरेडमध्ये १२७ गावात कृषी संजीवनी माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यातील १२७ गावांमध्ये कृषी संजीवनी मोहीम राबविण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. या मोहिमेचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : तालुक्यातील १२७ गावांमध्ये कृषी संजीवनी मोहीम राबविण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. या मोहिमेचा प्रारंभ तालुक्यातील कळमना आणि हेवती या गावापासून करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक दिवशी महत्त्वांच्या मोहिमेकडे लक्ष राहणार असून, कृषी विभागाची चमू गावागावात पोहोचणार आहे.

रूंद वरंबा सरी तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, एक गाव-एक वाण तसेच तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञान व प्रसार, दोन पिकात उत्पादन वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, कीड व नियंत्रणाच्या उपाययोजना अशा संपूर्ण कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या मोहिमेचा समारोप कृषी दिनाला करण्यात येणार आहे.

पंचायत समितीचे सभापती रमेश किलनाके यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी एन. टी. देशमुख, जि. प. सदस्य माधुरी गेडाम, एम. व्ही. खंडाईत, सरपंच सुरेखा वाघ, उपसरपंच भिकाजी भोयर, ग्रामसेवक जे. एन. पाडावी, ए. जी. शिंदे, शंकर कोरडे आदींची उपस्थिती होती.