शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

कृषी उत्पन्न बाजार समिती संप; विदर्भातील बाजार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 15:33 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपिकापासून शिपायापर्यंत सर्वांना शासनसेवेत सामावून घेण्यात यावे याकरिता २८ फेब्रुवारीपासून राज्यात पुकारण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधील धान्य खरेदीचे व्यवहार ठप्प झाले.

ठळक मुद्देमालाची खरेदी-विक्री थांबलीशेतकऱ्यांची झाली कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपिकापासून शिपायापर्यंत सर्वांना शासनसेवेत सामावून घेण्यात यावे याकरिता २८ फेब्रुवारीपासून राज्यात पुकारण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधील धान्य खरेदीचे व्यवहार ठप्प झाले.वर्धा जिल्ह्यातील देवळी व हिंगणघाट येथे कापूस बाजार मात्र यातून सुटला होता. वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. संपाची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना असल्याने त्यांनी आपला माल समितीत आणला नव्हता.यवतमाळ जिल्ह्यातील १७ पैकी १६ समित्यांचे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यात एकूण १९० पैकी १७५ कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी या संपातून अंग काढून घेतल्याने तेथील खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत सुरू आहे. कर्मचारीच संपावर असल्याने जिल्ह्यातील उमरखेड वगळता १६ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले आहे. बाजार समितीतील सोयाबीन, तूर, हरभरा, गहू आदी मालाची खरेदी-विक्री व उलाढाल थांबली आहे. मुंबईत बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा बेमुदत संप सुरू झाल्याने शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान शासनाच्याविरोधात जायचे नाही, असे स्पष्ट करीत उमरखेड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाही.गोंदिया जिल्ह्यात देवरी, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा, आमगाव अशा एकूण सात कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. गुरूवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने या सातही बाजार समित्यांमधील खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. केवळ प्रशासकीय कामकाज सुरू होते. कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर धरणे दिली. कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा फटका काही प्रमाणात धानाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बसला. बाजार समितीत खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्याने त्यांना आल्या पावलीच परत जावे लागले.भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील कर्मचारी गेले आहेत. या संपामुळे बाजार समितीचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. जिल्ह्यात तुमसर, भंडारा, लाखनी आणि पवनी येथे बाजार समिती असून या संपात ४२ कर्मचारी सहभागी झाले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील १३ ही बाजार समित्यांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. चंद्रपूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, पोंभुर्णा, मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा व भद्रावती बाजार समितीतील शेती माल खरेदी-विक्री व उलाढाल थांबली आहे.

टॅग्स :Strikeसंप