शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाने दडविले १५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:01 IST

कीटकनाशक फवारणीमुळे आणि कीटकनाशक प्राशनामुळे नागपूर शहर-जिल्ह्यात १५ शेतकºयांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी काढली अधिकाºयांची खरडपट्टी : शेतकºयांना मार्गदर्शन करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे आणि कीटकनाशक प्राशनामुळे नागपूर शहर-जिल्ह्यात १५ शेतकºयांचा मृत्यू झाला. परंतु या मृत्यूची माहिती कृषी अधिकाºयांनी दडवून ठेवली. लोकप्रतिनिधीला साधी माहिती देण्याचे सौजन्य अधिकाºयांनी दाखविले नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रविभवन येथे तातडीची बैठक बोलावून अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात सोमवारी रविभवनात बैठक बोलावली होती. या बैठकीला आ. मल्लिकार्जुन रेड्डी आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे ५ आणि कीटकनाशक प्राशनाने १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी अधीक्षकांनी या बैठकीत दिली. १८ जुलैला पहिला मृत्यू झाला असताना आजतागायत या मृत्यूची माहिती कृषी, महसूल आणि पोलीस विभागाला, पालकमंत्र्यांना द्यावीशी वाटली नाही. पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली म्हणून त्यांना या अक्षम्य प्रकाराची माहिती मिळाली.महसूल, कृषी आणि पोलीस या तीनही विभागांचा एकमेकात समन्वय नसल्याचे दिसले. या घटना टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकºयांना आणि शेतमजुरांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. कृषी विभाग म्हणतो १५ जणांचा मृत्यू झाला तर पोलीस म्हणतात ९ जणांची नोंद आमच्याकडे आहे.एकूणच तीनही विभागांमध्ये कोणताच समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. कृषी अधीक्षकासोबत महसूल विभागाचा एकही उपविभागीय अधिकारी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्यास गेला नसल्याचेही आढळले. प्रशासनच या घटनांपासून अंधारात राहाते. कृषी विभागाच्या अत्यंत ढिम्म, ढिसाळ, उदासीन आणि संवेदनाशून्य कारभाराचा हा नमुना आजच्या बैठकीत पाहायला मिळाला. लोकप्रतिनिधींना माहिती न दिल्यामुळे ते मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास जाऊ शकले नाहीत आणि शासनाबद्दल गैरसमज पसरण्यास मदत झाली.पिकांवर फवारणी करताना विषबाधेने मृत झालेल्यांमध्ये कळमेश्वर येथील माणिक शेंडे, भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील प्रभाकर मिसाळ, कामठी तालुक्यातील उनगाव येथील मुरलीधर खडसे, मौदा तालुक्यातील पावडदौना येथील संभाजी वांगे, खात येथील दिनेश ढोलवार यांचा समावेश आहे.कृषी अधिकारीच अनभिज्ञकीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत झालेल्या व्यक्तींबद्दल कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांनाही माहिती नसल्याची बाब या बैठकीत निदर्शनास आली. एकही कृषी सहायक आणि कृषी अधिकारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे आणि शेतकºयांच्या संपर्कात राहात नसल्यामुळे त्यांना ही माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले.मुख्यालयी राहून मदत करायावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी कृषी अधिकाºयांना मृत शेतकºयांच्या घरी भेटी देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करा, मुख्यालयी राहून शेतकºयांना योग्य ती मदत तात्काळ करा, असे निर्देश दिले.