शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रोगमुक्त रोपे विकसित करण्यासाठी सात रोपवाटिकांशी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 07:00 IST

Nagpur News शेतकऱ्यांना रोगमुक्त रोपे मिळावीत यासाठी ‘आयसीएआर-सीसीआरआय’ने (इंडियन कॉन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च-सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देआयसीएआर-सीसीआरआयचा पुढाकार वर्षाअखेरीस आणखी २५ सामंजस्य करार

स्नेहलता श्रीवास्तव

नागपूर : शेतकऱ्यांना रोगमुक्त रोपे मिळावीत यासाठी ‘आयसीएआर-सीसीआरआय’ने (इंडियन कॉन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च-सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत ‘सीसीआरआय’ने सात रोपवाटिकांशी करार केला आहे व त्यांना तंत्रज्ञान हस्तांतरित केले आहे. वर्षभरात आणखी २५ रोपवाटिकांशीदेखील सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.

सर्व प्रकारची लिंबूवर्गीय फळे रोपवाटिकांमधून मिळविलेल्या लागवड साहित्यातून घेतली जातात. परंतु जर ही रोपे सदोष असतील आणि त्यांना काही रोग असतील तर ते काही वर्षांत संपूर्ण बाग नष्ट करू शकतात. दुर्दैवाने बहुसंख्य रोपवाटिका रोपवाटिका कायद्यांतर्गत नियमांचे पालन करत नाहीत व त्यामुळे विषाणू, जिवाणू किंवा इतर रोगजनक वनस्पती शेतकऱ्यांच्या वाटी येतात.

संस्थेला तंत्रज्ञान हस्तांतरण शुल्क म्हणून एका रोपवाटिकेकडून सुमारे ९ लाख रुपये मिळतात.

ईशान्येकडील लिंबूवर्गीय राज्ये, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात लवकरात लवकर पोहोचण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आणखी ३-४ वर्षांत सर्व काही व्यवस्थित राहिल्यास सर्व लिंबूवर्गीय जातींची रोगमुक्त रोपे देशभर उपलब्ध होतील, असे सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी सांगितले.

लिंबूवर्गीय (संत्रा, मोसंबी, लिंबू) या पिकांचा वार्षिक उद्योग २५,००० कोटी रुपयांचा आहे. दरवर्षी देशभरात सुमारे दीड कोटी रोपांची गरज असते. रोपवाटिकेत प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या अशा कळ्या-कलमांचा वापर हे रोगांच्या प्रसाराचे मुख्य कारण आहे.

आम्ही एक संशोधन संस्था आहोत आणि म्हणून आमचे प्राधान्य संशोधन व विकास आहे. त्यामुळे प्रदेशाची मागणीही आम्ही पूर्ण करू शकत नाही. परिसरात सुमारे १५ लाखांची मागणी आहे. परंतु आम्ही केवळ साडेतीन लाख रोपेच निर्माण करू शकतो. तसेच देशातील सर्व लिंबूवर्गीय क्षेत्रांतील शेतकऱ्यांनाही या रोपांची गरज आहे. त्यामुळेच सात रोपवाटिकांसोबत करार करण्याचे पाऊल उचलण्यात आले, असे डॉ. घोष यांनी स्पष्ट केले.

असे आहे तंत्रज्ञान

सीसीआरआयने २००३-०४ मध्ये निरोगी मातृवृक्षांच्या निर्मितीचे उद्देश डोळ्यासमोर ठेवत ‘एसटीजी’ (शूट टिप ग्राफ्टिंग) वापरून रोगमुक्त रोपांसाठी तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानाला ‘कंटेनराइज्ड नर्सरी सिस्टिम’ असे म्हणतात. त्यात पॉटिंग मिश्रणाचे ‘सोलरायझेशन’, कीडमुक्त शेडमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक रोपवाटिका वाढवणे तसेच मातृ वनस्पतींचे सेरोलॉजिकल आणि बायोलॉजिकल इंडेक्सिंग व रोगजनकांच्या साफसफाईसाठी ‘एसटीजी’ तंत्र वापरणे याचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेती