शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अग्नितांडव

By admin | Updated: April 18, 2017 02:13 IST

चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे.

ब्राह्मणीत घर तर खरड्यात गोठा खाक : भगवानपूर शिवारात शेतीपयोगी साहित्य जळालेनागपूर : चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे. दुसरीकडे आगीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे. जिल्ह्यात सोमवारी आगीच्या दोन आणि रविवारी एक अशा तीन घटना घडल्या. सोमवारी दुपारी मौदा तालुक्यातील खरडा शिवारात असलेला गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील घर जळाले. शिवाय, रविवारी सायंकाळी भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारातील शेतीपयोगी साहित्य व जनावरांचा चारा आगीत राख झाला. मौदा तालुक्यातील कोदामेंढी-रेवराळ मार्गावरील खरडा गावालगतच्या शेतात असलेल्या तणसाच्या गंजीला सोमवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. अल्पावधीतच आगीने रुद्र रूप धारण केले आणि ही आग पसरत जवळच असलेल्या गोठ्याला लागली. आगीच्या दाहकतेमुळे गोठ्यातील जनावरे पळण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांचे दोरखंड वेळीच कापण्यात आल्याने ती जनावरे थोडक्यात बचावली. माहिती मिळताच खरडा व रेवराळ येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी मिळेल त्या साधनाने गोठा व तणसाच्या ढिगाला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. गोठ्याची आग नियंत्रणात येईपर्यंत गोठ्यात ठेवलेले १० पोती गहू, कुटार (जनावरांचे वैरण), शेतीपयोगी साहित्य व औजारे खाक झाली. आगीची माहिती मिळताच अरोली पोलिसांनी अग्निशमन दलाला सूचना दिली होती. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले नव्हते. तोपर्यंत नागरिकांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले होते. कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील रहिवासी महादेव विठोबा पर्बत यांच्या घराला सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी घरी कुणीही नसल्याने प्राणहानी झाली नाही. परंतु या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य खाक झाले. घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यातच कळमेश्वर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारातील शेतातील कचऱ्याने पेट घेतला. ही आग हवेमुळे दुसऱ्या शेतापर्यंत पसरत गेली. त्यात शेतात साठवून ठेवलेला गुरांचा चारा आणि शेतीपयोगी साहित्याची राख झाली. (प्रतिनिधींकडून)तरुण जखमी, जनावरे बचावलीखरडा येथील शेतात असलेल्या तणसाच्या गंजीची आग पसरल्याने आगीने जवळच असलेल्या गोठ्याला कवेत घेतले. गोठ्यात त्यावेळी तीन गाई, एक म्हैस, एक कालवड व एक वगार अशी एकूण सहा जनावरे बांधली होती. ही जनावरे आगीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. परंतु, त्यांना बांधलेल्या दोरखंडामुळे ते पळून जाऊ शकत नव्हते. त्यातच गोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच प्रकाश रामकृष्ण कोल्ली, रा. खरडा हा तरुण जीवाची पर्वा न करताना लगेच गोठ्यात शिरला. त्याने सावधगिरी बाळगत गोठ्यातील सर्व जनावरांचे दोरखंड वेळीच कापले. यात गोठ्यातील सर्व जनावरे थोडक्यात बचावली. परंतु, प्रकाश कोल्ली यांच्या चेहऱ्याला जळाल्याने इजा झाली. चाऱ्याचे संकटमौदा व भिवापूर तालुक्यात तणसाचा वापर जनावरांचे वैरण म्हणून केला जातो. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतांमध्ये तसेच गावालगतच्या शेतांमध्ये तणसाचे मोठमोठे ढीग लावले आहेत. या ढिगाजवळ तसेच शेतात सर्वत्र कचरा पडलेला असतो. या कचऱ्यावर कुणी जळती बिडी जरी टाकली तरी कचऱ्याला लागलेली आग अल्पावधीत दूरवर पसरते. त्यामुळे तणसाचे ढीग लावताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. खरडा येथील आगीत गोठ्याजवळ ठेवलेले तणसाचे दोन्ही ढीग पूर्णपणे जळाले. शिवाय, भगवानपूर शिवारातील आगीत राजू भुसारी यांच्यासह इतरांच्या शेतात ठेवलेले तणसाचे ढीग खाक झाले. त्यामुळे या शेतकऱ्यांवर जनावरांच्या चाऱ्याचे नवे संकट ओढवले आहे.