शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अग्नितांडव

By admin | Updated: April 18, 2017 02:13 IST

चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे.

ब्राह्मणीत घर तर खरड्यात गोठा खाक : भगवानपूर शिवारात शेतीपयोगी साहित्य जळालेनागपूर : चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे. दुसरीकडे आगीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे. जिल्ह्यात सोमवारी आगीच्या दोन आणि रविवारी एक अशा तीन घटना घडल्या. सोमवारी दुपारी मौदा तालुक्यातील खरडा शिवारात असलेला गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील घर जळाले. शिवाय, रविवारी सायंकाळी भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारातील शेतीपयोगी साहित्य व जनावरांचा चारा आगीत राख झाला. मौदा तालुक्यातील कोदामेंढी-रेवराळ मार्गावरील खरडा गावालगतच्या शेतात असलेल्या तणसाच्या गंजीला सोमवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. अल्पावधीतच आगीने रुद्र रूप धारण केले आणि ही आग पसरत जवळच असलेल्या गोठ्याला लागली. आगीच्या दाहकतेमुळे गोठ्यातील जनावरे पळण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांचे दोरखंड वेळीच कापण्यात आल्याने ती जनावरे थोडक्यात बचावली. माहिती मिळताच खरडा व रेवराळ येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी मिळेल त्या साधनाने गोठा व तणसाच्या ढिगाला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. गोठ्याची आग नियंत्रणात येईपर्यंत गोठ्यात ठेवलेले १० पोती गहू, कुटार (जनावरांचे वैरण), शेतीपयोगी साहित्य व औजारे खाक झाली. आगीची माहिती मिळताच अरोली पोलिसांनी अग्निशमन दलाला सूचना दिली होती. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले नव्हते. तोपर्यंत नागरिकांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले होते. कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील रहिवासी महादेव विठोबा पर्बत यांच्या घराला सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी घरी कुणीही नसल्याने प्राणहानी झाली नाही. परंतु या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य खाक झाले. घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यातच कळमेश्वर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारातील शेतातील कचऱ्याने पेट घेतला. ही आग हवेमुळे दुसऱ्या शेतापर्यंत पसरत गेली. त्यात शेतात साठवून ठेवलेला गुरांचा चारा आणि शेतीपयोगी साहित्याची राख झाली. (प्रतिनिधींकडून)तरुण जखमी, जनावरे बचावलीखरडा येथील शेतात असलेल्या तणसाच्या गंजीची आग पसरल्याने आगीने जवळच असलेल्या गोठ्याला कवेत घेतले. गोठ्यात त्यावेळी तीन गाई, एक म्हैस, एक कालवड व एक वगार अशी एकूण सहा जनावरे बांधली होती. ही जनावरे आगीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. परंतु, त्यांना बांधलेल्या दोरखंडामुळे ते पळून जाऊ शकत नव्हते. त्यातच गोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच प्रकाश रामकृष्ण कोल्ली, रा. खरडा हा तरुण जीवाची पर्वा न करताना लगेच गोठ्यात शिरला. त्याने सावधगिरी बाळगत गोठ्यातील सर्व जनावरांचे दोरखंड वेळीच कापले. यात गोठ्यातील सर्व जनावरे थोडक्यात बचावली. परंतु, प्रकाश कोल्ली यांच्या चेहऱ्याला जळाल्याने इजा झाली. चाऱ्याचे संकटमौदा व भिवापूर तालुक्यात तणसाचा वापर जनावरांचे वैरण म्हणून केला जातो. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतांमध्ये तसेच गावालगतच्या शेतांमध्ये तणसाचे मोठमोठे ढीग लावले आहेत. या ढिगाजवळ तसेच शेतात सर्वत्र कचरा पडलेला असतो. या कचऱ्यावर कुणी जळती बिडी जरी टाकली तरी कचऱ्याला लागलेली आग अल्पावधीत दूरवर पसरते. त्यामुळे तणसाचे ढीग लावताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. खरडा येथील आगीत गोठ्याजवळ ठेवलेले तणसाचे दोन्ही ढीग पूर्णपणे जळाले. शिवाय, भगवानपूर शिवारातील आगीत राजू भुसारी यांच्यासह इतरांच्या शेतात ठेवलेले तणसाचे ढीग खाक झाले. त्यामुळे या शेतकऱ्यांवर जनावरांच्या चाऱ्याचे नवे संकट ओढवले आहे.