शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शरद जोशींचे आंदोलन म्हणजे विरोधाभासच

By admin | Updated: November 25, 2014 00:54 IST

शेतकऱ्यांशी संबंधित निरनिराळ्या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु आजपर्यंत ज्या शासनाचा सातत्याने विरोध केला

विजय जावंधिया यांची टीका : विदर्भ गौरव पुरस्काराने झाला सन्माननागपूर : शेतकऱ्यांशी संबंधित निरनिराळ्या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु आजपर्यंत ज्या शासनाचा सातत्याने विरोध केला त्यांच्याकडेच मागणी करायला जाणे हा विरोधाभासाचाच प्रकार आहे या शब्दांत विजय जावंधिया यांनी शरद जोशींवर जोरदार हल्लाबोल केला. कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे स्व.माणिकलालजी गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विदर्भ गौरव पुरस्काराने जावंधिया यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रभाषा संकुल येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान जावंधिया यांनी मतप्रदर्शन केले.देशातील शेतकऱ्यांच्या गरिबीचे कारण या व्यवस्थेतच आहे. ही बाब लक्षात आल्यामुळेच मी व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आंदोलनात उतरलो. परंतु शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या हक्कापेक्षा स्वत:च्या स्वार्थाला जास्त प्राधान्य दिले. कार्यकर्ते जीव तोडून मेहनत करत होते आणि जोशी यांनीच नेहमी सर्व श्रेय लाटले. कार्यकर्त्यांच्या क्षमतांना वाव देण्यात जोशी अपयशी ठरले असे जावंधिया म्हणाले. उणे सबसिडीचे गणित शेतकऱ्यांच्याच अंगावर उलटले. शेतकऱ्यांच्या गरिबीचे कारण या व्यवस्थेत आहे. त्यामुळेच व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आंदोलनात पडलो. पण अजूनही उत्तर काही सापडले नाही अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. विदर्भ गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार दत्ता मेघे, माजी वनमंत्री नानाभाऊ एम्बडवार, माजी मंत्री रमेश बंग, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, कार्याध्यक्ष श्रीराम काळे, उपाध्यक्ष सोमेश्वर पुसदकर, सचिव बंडोपंत उमरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. शाल, श्रीफळ व २५ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. देशातील शेतकरी सर्वात दुर्दैवी आहे. त्याच्या शोषणावरच देशाची अर्थव्यवस्था आधारित आहे अशी टीका एम्बडवार यांनी केली. पुरोहित व बंग यांनीदेखील आपले मत यावेळी मांडले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)मी पक्ष का बदलविले?या कार्यक्रमप्रसंगी दत्ता मेघे यांनी चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. चांगल्या लोकांचे विचार कृतीत येणे आवश्यक असते. त्यासाठी पद मिळणे फार आवश्यक असते. मी पक्ष बदलविले म्हणून माझ्यावर टीका होते. पण त्यात गैर ते काय? शेवटी सन्मान अन् भविष्याचाही विचार करायला हवा. माझ्या मुलाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझे ऐकले नाही, अन्यथा तो खासदार राहिला असता असे ते म्हणाले.