शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

कृषी विभागातील भरती प्रक्रियेचा घोळ पेटला !

By admin | Updated: October 2, 2015 07:45 IST

कृषी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा घोळ आता चांगलाच पेटला आहे. चंद्रपूर येथील ‘सर्च’ या संस्थेने

नागपूर : कृषी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा घोळ आता चांगलाच पेटला आहे. चंद्रपूर येथील ‘सर्च’ या संस्थेने भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना अक्षरश: वेठीस धरले आहे. कृषी विभाग व संबंधित संस्था सर्व नियम धाब्यावर बसवून ही निवड प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे कृषी विभागातील कंत्राटी तरुण कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या ‘आत्मा’ एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनतर्फे या संपूर्ण निवड प्रक्रियेवर तीव्र आक्षेप नोंदवून, ही निवड प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘सर्च’ या संस्थेने नागपूर विभागात २८२ पदे रिक्त नसताना, ती सर्व पदे भरण्याची बोगस जाहिरात प्रकाशित करू न हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक केली आहे. एवढेच नव्हे, मुलाखतीच्या नावाखाली हजारो तरुणांकडून प्रत्येकी एक हजार रुपये हडप करण्यात आले आहेत. असे असताना कृषी विभाग संबंधित संस्थेला रोखण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी अजूनपर्यंत या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही. उलट कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे विभागातील सर्व ‘आत्मा’ प्रकल्प संचालकांना एक पत्र जारी करू न त्यांना आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची संबंधित संस्थेकडून भरती करू न द्यावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संबंधित संस्थेने मागील २ ते ५ सप्टेंबर दरम्यान मुलाखती घेऊनसुद्धा अजूनपर्यंत उमेद्वारांची अंतिम निवड यादी जाहीर केलेली नाही. असे असताना संबंधित संस्था ‘आत्मा’ प्रकल्प संचालकांकडे उमेदवार कसे पाठवू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय अजूनपर्यंत संबंधित संस्थेने किती उमेद्वारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यापैकी किती उमेद्वारांची अंतिम निवड झाली, याविषयी कुठेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही संपूर्ण निवड प्रक्रिया संशयाच्या घेऱ्यात अडकली असून, त्याला कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)एका दिवसाच्या सुटीवरू न सेवा समाप्ती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश झुगारू न चंद्रपूर येथील ‘आत्मा’ प्रकल्प संचालकांनी त्यांच्याकडील सहा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (बीटीएम) व एका सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकाला (एटीएम) नोकरीतून तडकाफडकी काढल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यापैकी होले नावाच्या एका कर्मचाऱ्याला केवळ तो एक दिवस न सांगता सुटीवर गेल्याच्या कारणावरू न त्याची सेवा समाप्त करण्यात आली आहे. यासंबंधी चंद्रपूर येथील ‘आत्मा’ प्रकल्प संचालकांनी जारी केलेल्या आदेशाची प्रत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला मिळाली आहे. शिवाय ‘आत्मा’ एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनतर्फे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमक्ष एक अर्ज सादर करू न, न्यायालयाच्या आदेशाची अवमानना झाली असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रहांगडाले यांनी दिली. दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्यांना आपली घोडचूक लक्षात घेताच त्यांनी सावरासावर सुरू केली आहे. त्यामुळे त्यांनी काढलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थेच्या माध्यमातून पुन्हा नोकरीवर घेण्याचा खटाटोप केला जात आहे. कृषी विभागाची बनवाबनवी मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या घोळासंबंधी ‘लोकमत’ प्रतिनिधीने दोन दिवसांपूर्वी कृषी सहसंचालक विजय घावटे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी याप्रकरणी अजूनपर्यंत आपल्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय तशी तक्रार आल्यास चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले होते. मात्र, ‘आत्मा’ एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विनोद रहांगडाले यांच्या मते, मागील ३१ आॅगस्ट रोजीच कृषी सहसंचालक घावटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना याप्रकरणी लेखी तक्रार देण्यात आली आहे. शिवाय ‘सर्च’ संस्थेच्या निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला असल्याचे रहांगडाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घावटे यांना दिलेल्या तक्रारीची प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. यावरू न कृषी विभागाच्या बनवाबनवीचा भंडाफोड झाला असून, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, कृषी सहसंचालक विजय घावटे यांची कृषी विभागातील एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख आहे. मात्र असे असताना या प्रकरणात ते संबंधित संस्थेला पाठीशी घालण्याचा का प्रयत्न करीत आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.