शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कावीळवर सुरू आहेत अघोरी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST

- जागतिक कावीळ दिन नागपूर : ‘हेपेटायटिस ए’ आणि ‘ई’मुळे कावीळ हा आजार होतो. औषधोपचार न करताही कावीळ ९९ ...

- जागतिक कावीळ दिन

नागपूर : ‘हेपेटायटिस ए’ आणि ‘ई’मुळे कावीळ हा आजार होतो. औषधोपचार न करताही कावीळ ९९ टक्के बरी होते. परंतु कावीळला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यातच चुकीच्या जाहिरातीमुळे ३० ते ४० टक्के रुग्ण आयुर्वेदाच्या नावावर असामाजिक तत्त्वांकडून उपचार घेतात. यामुळे जिथे दोन आठवड्यांत स्वत:हून बरा होणारा हा आजार गंभीर होत असल्याची प्रकरणे वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

२८ जुलै हा दिवस ‘जागतिक कावीळ दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अमोल समर्थ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

डॉ. समर्थ म्हणाले, ‘बिलिरुबिन’च्या उच्चस्तरामुळे डोळ्याचा पांढरा भाग, त्वचा किंवा श्लेष्मल पडद्यात पिवळेपणा येतो, ही कावीळची लक्षणे आहेत. कावीळला इंग्रजीत ‘जॉन्डिस’ म्हटले जाते. कावीळ हा यकृताचा (लिव्हर) आजार आहे. व्हायरलच्या संक्रमणात लिव्हरच्या पेशी अपयशी ठरल्याने हा आजार होता. लिव्हरच्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी तत्काळ निदान, योग्य लसीकरण आणि दारूच्या सेवनापासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक ठरते.

- कावीळचे पाच प्रकार

‘हेपेटायटिस’ म्हणजेच कावीळ. याचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. त्यामध्ये ‘हेपेटायटिस ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ व ‘ई’ यांचा समावेश आहे. यातील ‘हेपेटायटिस बी’ आणि ‘सी’ हे विषाणू मानवी यकृतावर गंभीर परिणाम करतात. या दोन्ही विषाणूंचा संपर्क हा रक्ताशी अधिक येतो. ‘हेपेटायटिस बी’ हा आईकडून बाळाकडे संक्रमित होण्याचा धोका असतो. ‘हेपेटायटिस ए’ आणि ‘ई’ हे विषाणू तोंडावाटे शरीरात पोहोचतात. याला वैद्यकीय भाषेत ‘फेस्को ओरल ट्रॉन्समिशन’ म्हणून ओळखले जाते. या रुग्णांना दूषित अन्नपदार्थ, पाण्यातून संसर्ग होतो.

- जडीबुटीच्या नावावर ‘स्टेरॉयड’

‘हेपेटायटिस’च्या विषाणूचा अभ्यास करून आता कुठे, १९७३ ते १९९० च्या दरम्यान माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु आयुर्वेदच्या नावावर असामाजिक तत्त्व कोणत्याही प्रकारची कावीळ मुळापासून संपविण्याचा दावा करतात. जडीबुटीच्या नावावर ‘स्टेरॉयड’ देतात.

- कावीळ झाडण्यापासून दूर राहा

कावीळ बरा करण्याच्या नावावर कानात औषधी टाकणे, नाकात औषधी टाकणे, कावीळ झाडणे, पानात औषधी देणे, उलटीद्वारे कावीळ काढणे, शौचातून कावीळ काढणे, लघवीतून कावीळ काढणे आदी अघोरी प्रकार शहरात आजही सुरू आहेत. यामुळे जो रोग स्वत:हून बरा होऊ शकतो तो आणखी गंभीर होत असल्याचेही डॉ. समर्थ म्हणाले.