शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कावीळवर सुरू आहेत अघोरी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST

- जागतिक कावीळ दिन नागपूर : ‘हेपेटायटिस ए’ आणि ‘ई’मुळे कावीळ हा आजार होतो. औषधोपचार न करताही कावीळ ९९ ...

- जागतिक कावीळ दिन

नागपूर : ‘हेपेटायटिस ए’ आणि ‘ई’मुळे कावीळ हा आजार होतो. औषधोपचार न करताही कावीळ ९९ टक्के बरी होते. परंतु कावीळला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यातच चुकीच्या जाहिरातीमुळे ३० ते ४० टक्के रुग्ण आयुर्वेदाच्या नावावर असामाजिक तत्त्वांकडून उपचार घेतात. यामुळे जिथे दोन आठवड्यांत स्वत:हून बरा होणारा हा आजार गंभीर होत असल्याची प्रकरणे वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

२८ जुलै हा दिवस ‘जागतिक कावीळ दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अमोल समर्थ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

डॉ. समर्थ म्हणाले, ‘बिलिरुबिन’च्या उच्चस्तरामुळे डोळ्याचा पांढरा भाग, त्वचा किंवा श्लेष्मल पडद्यात पिवळेपणा येतो, ही कावीळची लक्षणे आहेत. कावीळला इंग्रजीत ‘जॉन्डिस’ म्हटले जाते. कावीळ हा यकृताचा (लिव्हर) आजार आहे. व्हायरलच्या संक्रमणात लिव्हरच्या पेशी अपयशी ठरल्याने हा आजार होता. लिव्हरच्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी तत्काळ निदान, योग्य लसीकरण आणि दारूच्या सेवनापासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक ठरते.

- कावीळचे पाच प्रकार

‘हेपेटायटिस’ म्हणजेच कावीळ. याचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. त्यामध्ये ‘हेपेटायटिस ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ व ‘ई’ यांचा समावेश आहे. यातील ‘हेपेटायटिस बी’ आणि ‘सी’ हे विषाणू मानवी यकृतावर गंभीर परिणाम करतात. या दोन्ही विषाणूंचा संपर्क हा रक्ताशी अधिक येतो. ‘हेपेटायटिस बी’ हा आईकडून बाळाकडे संक्रमित होण्याचा धोका असतो. ‘हेपेटायटिस ए’ आणि ‘ई’ हे विषाणू तोंडावाटे शरीरात पोहोचतात. याला वैद्यकीय भाषेत ‘फेस्को ओरल ट्रॉन्समिशन’ म्हणून ओळखले जाते. या रुग्णांना दूषित अन्नपदार्थ, पाण्यातून संसर्ग होतो.

- जडीबुटीच्या नावावर ‘स्टेरॉयड’

‘हेपेटायटिस’च्या विषाणूचा अभ्यास करून आता कुठे, १९७३ ते १९९० च्या दरम्यान माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु आयुर्वेदच्या नावावर असामाजिक तत्त्व कोणत्याही प्रकारची कावीळ मुळापासून संपविण्याचा दावा करतात. जडीबुटीच्या नावावर ‘स्टेरॉयड’ देतात.

- कावीळ झाडण्यापासून दूर राहा

कावीळ बरा करण्याच्या नावावर कानात औषधी टाकणे, नाकात औषधी टाकणे, कावीळ झाडणे, पानात औषधी देणे, उलटीद्वारे कावीळ काढणे, शौचातून कावीळ काढणे, लघवीतून कावीळ काढणे आदी अघोरी प्रकार शहरात आजही सुरू आहेत. यामुळे जो रोग स्वत:हून बरा होऊ शकतो तो आणखी गंभीर होत असल्याचेही डॉ. समर्थ म्हणाले.