शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मेट्रोरिजनच्या सेटिंगसाठी एजंट सक्रिय

By admin | Updated: August 19, 2015 03:01 IST

नागपूर महानगर प्रारूप विकास आराखड्यावर (मेट्रोरिजन) घेतलेल्या आक्षेपांवर सुनावणी करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली.

आमिषाला बळी पडू नका : नासुप्र सभापतींचे आवाहन नागपूर : नागपूर महानगर प्रारूप विकास आराखड्यावर (मेट्रोरिजन) घेतलेल्या आक्षेपांवर सुनावणी करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली. या समितीने ७ आॅगस्टपासून सुनावणी सुरू केली आहे. मात्र, नासुप्रत घुटमळणारे व राजकीय वजन वाढलेले काही एजंट येथेही सक्रिय झाले आहेत. ते आक्षेप घेणाऱ्या नागरिकांना गाठून तुमच्या जमिनीवरील आरक्षण वगळून देण्याची हमी देऊन पैसे उकळत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार एवढे उघडपणे सुरू झाले आहेत की सुनावणी समितीच्या कानावरही या बाबी पोहचल्या आहेत. याची गंभीर दखल घेत अशा एजंटच्या आमिषांना बळी पडू नका, उलट असे काम करवून देण्याची कुणी हमी देत असेल तर थेट समितीच्या सदस्यांशी संपर्क साधून तक्रार नोंदवा, असे आवाहन नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी केले आहे. मेट्रोरिजनवर आलेल्या आक्षेपांची सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारने सुनावणी समिती नेमली. या समितीमध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश बिनिवाले, नगररचना विभागाचे माजी सहसंचालक अ. चं. मुंजे, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय कापसे, नासुप्र सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नगररचना सहसंचालक एन. एस. अढारी यांचा समावेश आहे. समितीने ७ आॅगस्टपासून कामठी तालुक्यातील आक्षेपांवर सुनावणीस सुरुवात केली व १७ आॅगस्ट रोजी सुनावणी पूर्ण केली. प्राप्त झालेल्या १००४ आक्षेपांपैकी ७५० आक्षेपांवर नियोजन समितीने प्रत्यक्ष सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान नागरिकांनी त्यांचे म्हणणे मांडले. समितीने ते ऐकून घेतले. नियमानुसार योग्य असलेले व कायदेशीर तरतुदीमध्ये राहून स्वीकारण्यायोग्य असलेले आक्षेप स्वीकारले जातील व ते ग्राह्य धरण्याची शिफारस राज्य सरकारला केली जाईल, असेही समितीने आक्षेपकर्त्यांना स्पष्ट केले होते. मात्र, आपली जमीन आरक्षणात जात असल्याची धास्ती घेतलेल्या नागरिकांना गाठून काही एजंट आपली पोळी शेकू पाहत आहेत. ‘तुमची जमीन ग्रीन बेल्टमधून येलो बेल्ट मध्ये करून देतो, एवढी एवढी रक्कम लागेल, माझे वरपर्यंत सेटिंग आहे’, असे हे एजंट नागरिकांना सांगत आहे. विशेष म्हणजे यात ‘राजकीय एजंट’ची संख्या मोठी आहे. आपण अमुक नेत्यांचे खास आहोत, आपल्या माध्यमातून गेलेले काम होते, असे सांगून ते नागरिकांना विश्वासात घेत आहेत. नागरिक आपली लाखमोलाची जमीन वाचविण्यासाठी एजंटच्या अशा आमिषाला बळी पडत असून लाखो रुपये देण्याची कबुली देत आहेत. काही रक्कम अ‍ॅडव्हान्सही देत आहेत. अशाच काही तक्रारी सुनावणी समितीपर्यंतही पोहचल्या आहेत. याची समितीने गंभीर दखल घेतली असून तक्रारीची चौकशी करून तत्थ्य आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)