शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
3
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
4
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
5
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
6
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
7
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
8
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
9
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
10
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
11
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
12
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
13
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
14
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
15
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
16
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
17
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
18
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
19
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
20
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

पुन्हा एका टोळीवर मकोका

By admin | Updated: January 31, 2016 02:55 IST

चैतन्य सुभाष आष्टनकर (वय १४) याच्या अपहरणकर्त्यांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे.

चैतन्य अपहरण कांड : गुन्हेगारी वर्तुळाला जबरदस्त हादरा नागपूर : चैतन्य सुभाष आष्टनकर (वय १४) याच्या अपहरणकर्त्यांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी आज रात्री पत्रकारांना ही माहिती दिली. गुन्हेगारी वर्तुळाला जबरदस्त हादरा देणारी चार दिवसांतील मोक्काची ही चौथी कारवाई होय. सोनेगांवच्या पाप्युलर सोसायटीत राहणारे सुभाष आत्मारामजी आष्टनकर (वय ५३) यांच्या चैतन्य नामक मुलाचे ७ जानेवारीला दुपारी अपहरण झाले होते. ५० लाखांच्या खंडणीसाठी प्रदीप ओमदास निनावे (वय ३६, रा. साईबाबा नगर, खरबी रिंग रोड, नागपूर) याच्या सांगण्यावरून आरोपी मुकेश उर्फ छट्टी किसन तायवाडे (वय २६, खापा, सावनेर), इसाक शेख इजराईल शेख (वय ३६, रा. खापा), दुर्वास भगवान कोहळे (वय २८, रा. खापा), तय्युब समशेर शेख (वय ३०, रा. खापा) आणि प्रभाकर संतोष खोब्रागडे (वय ४०, रा. खापा) यांनी हे अपहरण केले होते. कसून तपास केल्यानंतर तब्बल ३२ तासानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने आरोपी इसाकला खापा-सावनेर दरम्यान पकडले. त्याच्या ताब्यातून चैतन्यची सुटका केली. या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुन्हेगार मुकेश ऊर्फ छट्टी अद्याप फरार आहे. अटकेतील आरोपींच्या गुन्ह्यांचा अभिलेख (क्राईम रेकॉर्ड) लक्षात घेता पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी उपरोक्त गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी शेखर तोरे यांनी चौकशी करून उपरोक्त गुन्हेगारांवर आज मोक्का लावल्याचे उपायुक्त बलकवडे यांनी सांगितले.