शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

नागपुरात कारवाईनंतरही स्कूल बस बेलगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:02 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाईही केली.

ठळक मुद्दे१५६ वाहने नियमबाह्यविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाईही केली. तरीही नियमांना धुडकावून शेकडो स्कूल बस व व्हॅन रस्त्यावर धावत आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओनेही याला आता गंभीरतेने घेत कारवाईची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.उपराजधानीतील बहुसंख्य शाळेतील सुमारे ४० टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन तर १० टक्के विद्यार्थी हे आॅटोरिक्षांमधून प्रवास करतात. म्हणूनच विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाºया स्कूल बस व व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयारी करण्यात आली. या नियमानुसार शहरात स्कूल बस व व्हॅनचा वेग ताशी ४० कि.मी. तर ग्रामीण भागात ताशी ५० कि.मी. पेक्षा जास्त असता कामा नये असे नियम घालून दिले. यासाठी स्पीड गव्हर्नर (वेग गतिरोधक) बसविण्याची सक्ती केली. परंतु काही स्कूल बस व व्हॅन चालक या स्पीड गव्हर्नरमध्ये गडबड करून वेग वाढवून घेतात व जास्त पैशांच्या लोभापायी जास्तीत जास्त फेरया मारतात. आरटीओच्या तपासणीत दोषी आढळून येणारया अशा स्कूल बस व व्हॅनवर जप्तीची कारवाई केली. मोटार वाहन निरीक्षकांसमोर नवीन स्पीड गव्हर्नर लावून नंतरच वाहन सोडून देण्यात आले. परंतु पुन्हा-पुन्हा या यंत्रात गडबड करीत असल्याचा प्रकार समोर येत आहेत. परिणामी, आजही शेकडो स्कूल बस व व्हॅन बेलगाम धावत आहेत. या शिवाय नियमानुसार स्कूल बसमध्ये मदतनीस आवश्यक आहे. लहान मुले व विद्यार्थिनींच्या बसमध्ये महिला मदतनीस ठेवण्याचा नियम आहे, बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांच्या नावाची यादी व पालकांचे संपर्क क्रमांक, वाहनात शाळेची दप्तर ठेवण्यासाठी व्यवस्था असणे, आपत्कालीन दरवाजा असणे, वाहनाच्या दरवाज्यास चाईल्ड लॉक असणे, प्रथमोपचाराची पेटी असणे, वाहनामध्ये धोक्याचा इशारा देणारे इंडिकेटर्स बसविणे, वाहनामध्ये अग्निशमन यंत्र आसन क्षमतेनुसार असणे, विद्यार्थ्यांना चढताना व उतरताना आधारासाठी दरवाजाजवळ लोखंडी दांडा असणे यासारखे अनेक नियम आहेत. परंतु यातील बहुसंख्य नियम काही स्कूल बस व व्हॅनचालक पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत.ग्रामीणतर्फे ७७ तर शहरतर्फे ७९ वाहनांवर कारवाईनागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातर्फे एप्रिल ते आॅक्टोबर दरम्यान ७७ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून २ लाख ६८४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शहर आरटीओ कार्यालयातर्फे याच कालावधीत ७९ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून १ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कारवाईचा वेग वाढविणारनागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बस व व्हॅन तपासणी कारवाई वेळोवेळी केली जाते. या महिन्यापासून या कारवाईला आणखी गती देण्यात येईल. दोषी आढळून येणारया वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही वायु पथकांना देण्यात आले आहे.-श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण