शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘जय’नंतर आता ‘जयचंद’ही बेपत्ता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:21 IST

पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या जयचंदचे ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला आणि भंडाऱ्यातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वन परिक्षेत्रात मिळेनासे झाले आहे.

ठळक मुद्देकऱ्हांडल्यात दीड महिन्यापासून दर्शन नाहीपवनी, नागभीड, तळोधीतही पाऊलखुणा दिसेना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘जयचंद’ हा ‘जय’चा बछडा गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता झाला आहे. पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या जयचंदचे ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला आणि भंडाऱ्यातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वन परिक्षेत्रात मिळेनासे झाले आहे. या जंगलात त्याच्या पाऊलखुणाही दिसत नसल्याने तो नेमका कुठे बेपत्ता झाला, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे, वन विभागाने त्याला शोधण्यासाठी प्रभावी हालचालीही अद्याप सुरू केल्या नाहीत.जय हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची ‘ओळख’ ठरला होता. तो १८ एप्रिल २०१६ पासून बेपत्ता आहे. त्याचे शेवटचे वास्तव्य पवनी वन परिक्षेत्रात होते. त्याला शोधण्यासाठी वन विभागाने आटोकाट प्रयत्न केले. तेलंगणातील जंगलात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, अद्यापही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याच्या अचानक बेपत्ता होण्याने वातावरण तापले होते.जयचंद हा जयचा बछडा होय. त्याची शरीरयष्टी व रुबाबही जयप्रमाणेच आहे. उमरेड-कऱ्हांडल्यातील जयची उणीव भरून काढण्याचा प्रयत्नही जयचंदच्या निमित्ताने झाला, परंतु तोही अचानक बेपत्ता झाला. त्याचे शेवटचे लोकेशन फेब्रुवारी २०१८ मध्ये ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) वन परिक्षेत्रात आढळून आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या त्याचे ‘लोकेशन’ मिळत नसल्याने वन अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.अन् तो कालव्यात पडलाउमरेड कऱ्हांडला अभयारण्यात व्याघ्रदर्शनासाठी गोवंशापासून अन्य विविध फंडे वापरण्यात आले. वन कर्मचाऱ्यांकडून त्याचे अफलातून फोटोसेशन करण्यात आले. वाघांच्या बछड्यांचे नामकरण व त्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. वन अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे जयचंद हा १० जानेवारी २०१८ रोजी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडला होता. त्याच्या लोकेशनबाबत पवनी वनपरिक्षेत्राचे आरएफओ (वन्यजीव) बाबा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय, जयचंदविषयी बोलण्याचेही टाळले.‘जयचंद’ची ओळख‘जय’ व ‘वीरू’ या दोन बछड्यांना एकाच वाघिणीने नागझिरा (जिल्हा गोंदिया) अभयारण्यात जन्म दिला. जय २०१३ साली कऱ्हांडल्यात दाखल झाला आणि तिथेच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या पाच वेगवेगळ्या वाघिणीच्या सहवासातून २० बछड्यांचा जन्म झाला. यातील श्रीनिवास, बिट्टू आणि जयचंद हे तीन वाघ त्यांच्या रुबाबामुळे चर्चेत राहिले. श्रीनिवासचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर बिट्टू हा सध्या नागभीड, तळोधी वनपरिक्षेत्रात वास्तव्याला असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. यात सर्वाधिक देखणा असलेला जयचंद हा उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी वनपरिक्षेत्रात वास्तव्यास होता.

टॅग्स :Tigerवाघ