शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

‘जय’नंतर आता ‘जयचंद’ही बेपत्ता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:21 IST

पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या जयचंदचे ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला आणि भंडाऱ्यातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वन परिक्षेत्रात मिळेनासे झाले आहे.

ठळक मुद्देकऱ्हांडल्यात दीड महिन्यापासून दर्शन नाहीपवनी, नागभीड, तळोधीतही पाऊलखुणा दिसेना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘जयचंद’ हा ‘जय’चा बछडा गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता झाला आहे. पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या जयचंदचे ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला आणि भंडाऱ्यातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वन परिक्षेत्रात मिळेनासे झाले आहे. या जंगलात त्याच्या पाऊलखुणाही दिसत नसल्याने तो नेमका कुठे बेपत्ता झाला, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे, वन विभागाने त्याला शोधण्यासाठी प्रभावी हालचालीही अद्याप सुरू केल्या नाहीत.जय हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची ‘ओळख’ ठरला होता. तो १८ एप्रिल २०१६ पासून बेपत्ता आहे. त्याचे शेवटचे वास्तव्य पवनी वन परिक्षेत्रात होते. त्याला शोधण्यासाठी वन विभागाने आटोकाट प्रयत्न केले. तेलंगणातील जंगलात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, अद्यापही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याच्या अचानक बेपत्ता होण्याने वातावरण तापले होते.जयचंद हा जयचा बछडा होय. त्याची शरीरयष्टी व रुबाबही जयप्रमाणेच आहे. उमरेड-कऱ्हांडल्यातील जयची उणीव भरून काढण्याचा प्रयत्नही जयचंदच्या निमित्ताने झाला, परंतु तोही अचानक बेपत्ता झाला. त्याचे शेवटचे लोकेशन फेब्रुवारी २०१८ मध्ये ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) वन परिक्षेत्रात आढळून आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या त्याचे ‘लोकेशन’ मिळत नसल्याने वन अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.अन् तो कालव्यात पडलाउमरेड कऱ्हांडला अभयारण्यात व्याघ्रदर्शनासाठी गोवंशापासून अन्य विविध फंडे वापरण्यात आले. वन कर्मचाऱ्यांकडून त्याचे अफलातून फोटोसेशन करण्यात आले. वाघांच्या बछड्यांचे नामकरण व त्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. वन अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे जयचंद हा १० जानेवारी २०१८ रोजी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडला होता. त्याच्या लोकेशनबाबत पवनी वनपरिक्षेत्राचे आरएफओ (वन्यजीव) बाबा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय, जयचंदविषयी बोलण्याचेही टाळले.‘जयचंद’ची ओळख‘जय’ व ‘वीरू’ या दोन बछड्यांना एकाच वाघिणीने नागझिरा (जिल्हा गोंदिया) अभयारण्यात जन्म दिला. जय २०१३ साली कऱ्हांडल्यात दाखल झाला आणि तिथेच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या पाच वेगवेगळ्या वाघिणीच्या सहवासातून २० बछड्यांचा जन्म झाला. यातील श्रीनिवास, बिट्टू आणि जयचंद हे तीन वाघ त्यांच्या रुबाबामुळे चर्चेत राहिले. श्रीनिवासचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर बिट्टू हा सध्या नागभीड, तळोधी वनपरिक्षेत्रात वास्तव्याला असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. यात सर्वाधिक देखणा असलेला जयचंद हा उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी वनपरिक्षेत्रात वास्तव्यास होता.

टॅग्स :Tigerवाघ