शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

अपघातानंतर वर्धा मार्गावर जाम

By admin | Updated: August 28, 2016 02:02 IST

वर्धा मार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे हजारो प्रवाशांना तब्बल सहा तास मनस्ताप सहन करावा लागला

तब्बल सहा तास प्रवाशांची कुचंबणा : मेट्रो रेल्वेनेही केली कोंडी नागपूर : वर्धा मार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे हजारो प्रवाशांना तब्बल सहा तास मनस्ताप सहन करावा लागला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गिरनार कट परिसरात शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास अचानक दुचाकी स्वार समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रेलर (एमएच ४०/ एन ४२९०) चालकाने दुभाजक तोडून वाहन दुसऱ्या मार्गावर वळवले. तेवढ्यात त्या मार्गाने भरधाव ट्रक (डब्ल्यूबी ३३ / सी ४३८३) आल्यामुळे ट्रक आणि ट्रेलरची जोरदार टक्कर झाली. त्यामुळे ट्रेलर चालक गणेश जयराम कावळे (वय २८, रा. शिवशक्तीनगर पारडी) आणि ट्रक चालक सपन महातो (३०) तसेच क्लिनर सुबोध महातो (२३, रा. दोघेही मिदनापूर, प. बंगाल) हे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे दोन्ही अवजड वाहने रस्त्यावर आडवी आली. त्यात काही उत्साही वाहनचालकांनी मध्येच वाहन घातल्याने दोन्ही मार्गावरचा रस्ता बंद झाला. अपघाताची माहिती कळताच हिंगण्याचे ठाणेदार हेमंत कुमार खराबे आणि पोलीस निरीक्षक मोरेश्वर बारापात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना मेडिकलमध्ये पाठविले तर, रखडलेली वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, वाहने काढण्याला जागाच नसल्याने आणि दोन्हीकडून वाहनांचे येणे सुरूच असल्याने रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहने उभी झाली. त्यामुळे यात बसलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, शाळकरी मुले वृद्ध आणि रोजगारांच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्यांची तीव्र कुचंबणा झाली.तब्बल सहा तास या सर्वांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. वाहनांची कोंडी होण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाचाही हातभार लागला. या कामामुळे रस्त्यात ठिकठिकाणी बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य पडून असल्याने वाहनांवर मशिनरींसह, अवजड साहित्य पडण्याचा धोकाही वाढला होता. त्याचमुळे अनेक वाहन चालकांनी जागच्या जागीच थांबणे पसंत केले.