शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

नागपूर जिल्ह्यातले फुलझरी ७० वर्षानंतरही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 10:29 IST

ऊर्जेचे हब असलेल्या नागपूर जिल्ह्यातील असे एक गाव आहे, जिथे स्वातंत्र्याला ७० वर्षे लोटल्यानंतरही वीज पोहचली नाही. या गावाचे नाव आहे फुलझरी.

ठळक मुद्देपुनर्वसनाच्या व्यथाआदिवासी म्हणतात जंगलापासून दूर करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोच आहे. नागपूरला ऊर्जा हब म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अशा ऊर्जेचे हब असलेल्या नागपूर जिल्ह्यातील असे एक गाव आहे, जिथे स्वातंत्र्याला ७० वर्षे लोटल्यानंतरही वीज पोहचली नाही. या गावाचे नाव आहे फुलझरी. गाव निव्वळ ऊर्जेच्या बाबतीतच नाही, तर विकासाच्या बाबतीतही अंधारातच आहे. विशेष म्हणजे हे गाव बफर झोनमध्ये येत असल्याने, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुढे ठाकला आहे. येथील आदिवासींचा वनविभागाशी वनांच्या सानिध्यात राहण्यासाठी लढा सुरू आहे.रामटेक तालुक्याच्या देवलापार जि.प. सर्कलमध्ये फुलझरी हे गाव येते. फुलझरी गावात ४२ आदिवासी कुटुंब राहत होते. व्याघ्र प्रकल्पासाठी शासनाने या गावाचे पुनर्वसन ४० किलोमीटर दूर संग्रामपूर जवळ केले. मात्र तेथे कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. गावातील २२ कुटुंब पुनर्वसनाच्या ठिकाणी गेले आहेत. आधी वनजमिनीजवळ शेती करणे आणि वनोपज हेच त्यांच्या जगण्याचे साधन होते. त्यामुळे पुनर्वसनाच्या ठिकाणी रोजगार नसल्याने, जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.२० कुटुंब अद्याप फुलझरीमध्येच वास्तव्यास आहेत. त्यामुळे शासनाने या २० कुटुंबांना विकासापासून वंचित ठेवले आहे. वनविभागाने या गावाला गावबंदी केली आहे. गावात येण्यासाठी केवळ कच्ची पायवाट आहे. वन विभागाने लावलेल्या गेट मधूनच गावात प्रवेश करावा लागतो. तसेच गावात कोणत्याही प्रकारे वाहन आणता येत नाही. त्यामुळे काही सामान आणावयाचे असल्यास गेटपासून पायी आणवे लागते. वनविभागाने गावाला तारेच्या कुंपणाने घेरले आहे. पहारा लावण्यात आला असून पांदण रस्ते, तलावाकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. शेतातही जाऊ दिल्या जात नाही. आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, जिपचे उपाध्यक्ष शरद डोणेकर व तालुक्याचे समाजसेवक देवा वंजारी यांच्यासोबत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी फुलझरी गावात पोहचले. तेव्हा गावकऱ्यांनी समस्यांची सरबत्तीच केली.आदिवासी गाव सोडायला तयार नाहीतपुनर्वसन झालेल्या ठिकाणी कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गावातील अर्धी कुटुंबे अद्यापही गावातच वास्तव्याला आहेत. आम्हाला वाघ व सापांची भीती नाही. आम्ही त्यांची पूजा करतो. मात्र आम्हाला आमची जमीन व मातीपासून दूर करू नका, अशी व्यथा गावकऱ्यांची आहे.शाळेची दूरवस्थागावात अंगणवाडी असून येथे १० मुले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत ७ विद्यार्थी शिक्षण घेतात. गावात सुविधा नसल्याने एक शिक्षक देवलापार तर एक शिक्षिका नागपूर येथून अपडाऊन करतात. शाळेतील शौचालयाची दुरवस्था असून, त्याचा दरवाजाही तुटलेला आहे.

टॅग्स :Governmentसरकार