शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नागपुरात ४२ दिवसांनंतर मृत्यूची संख्या ५०च्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. नागपूर जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर १३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ...

नागपूर : कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. नागपूर जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर १३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे, २४ एप्रिल रोजी हाच दर ३१ टक्क्यांहून अधिक होता. शनिवारी १५१० नव्या रुग्णांची तर, ४८ मृत्यूची नोंद झाली. ४२ दिवसांनंतर मृत्यूची संख्या ५०च्या खाली आली आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,६२,११० तर मृतांची संख्या ८,५२० झाली आहे.

‘कडक निर्बंध’चे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यात ८ हजारांजवळ गेलेली रुग्णसंख्या आता दीड हजारांच्या घरात आली आहे. मागील १५ दिवसांत साधारण ५०० ते ३०० दरम्यान रोज रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. मृत्यूदरातही घट आली असून, सध्या १.८४ टक्के आहे. परंतु, चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्येवर याचा परिणाम तर होत नाही ना, अशी शंकाही बोलून दाखविली जात आहे. शनिवारी ११,६११ चाचण्या झाल्या. २२ मार्चनंतर पहिल्यांदाच कमी चाचण्या झाल्या आहेत. आज रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, ४,७८० रुग्ण बरे झाले. बरे होण्याचा दर ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ४,२०,३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

-शहर व ग्रामीणमध्ये सारखेच रुग्ण

आज शहर आणि ग्रामीणमध्ये जवळपास सारखेच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. शहरात ७७४ तर ग्रामीणमध्ये ७२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात २२ तर ग्रामीणमध्ये १४ रुग्णांचे मृत्यू झाले. धक्कादायक म्हणजे, ग्रामीणमध्ये रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ४७.३२ टक्के आहे. शहरात हाच दर कमी होऊन ७.६७ टक्क्यांवर आला आहे. यावरून ग्रामीणमध्ये आरोग्य विभागाला अधिक काम करणे, विशेषत: चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

:: कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ११,६११

एकूण बाधित रुग्ण : ४,६२,११०

सक्रिय रुग्ण : ३३,२५९

बरे झालेले रुग्ण : ४,२०,३३१

एकूण मृत्यू : ८,५२०