शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

तब्बल २० वर्षांनंतर तिने मागितली अनुकंपा नोकरी.. न्यायालय म्हणाले, मनात येईल तेव्हा मागता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 07:10 IST

Nagpur News अनुकंपा नोकरी हवी असल्यास लगेच अर्ज करणे व नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा करीत राहणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुलीची याचिका फेटाळून लावली

राकेश घानोडे

नागपूर : अकस्मात मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार देणे, हा अनुकंपा नोकरीचा उद्देश आहे. त्यामुळे पीडित वारसदारांना मनात येईल तेव्हा या नोकरीची मागणी करता येत नाही. ही नोकरी हवी असल्यास लगेच अर्ज करणे व नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा करीत राहणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती रोहित देव यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. भंडारा जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शाळेतील दिवंगत कनिष्ठ लिपिकाची मुलगी आरती निमजे यांनी २० वर्षांनंतर अनुकंपा नोकरी मागितली होती. न्यायालयाने वरील बाबी नमूद करून ती याचिका फेटाळून लावली. आरती यांच्या वडिलांचे १४ जुलै १९९५ रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर आरती यांच्या भावाला नोकरी मिळावी, याकरिता आईने तीन वर्षांनंतर म्हणजे, ६ जुलै १९९८ रोजी सरकारकडे अर्ज सादर केला होता. परंतु, जागा रिक्त नसल्यामुळे भावाला नोकरी नाकारण्यात आली. पुढे या कुटुंबाने नोकरी मिळविण्यासाठी २० वर्षे काहीच पाठपुरावा केला नाही. दरम्यान, ३० एप्रिल २०१९ रोजी एक कनिष्ठ लिपिक सेवानिवृत्त झाल्यामुळे आरती यांनी त्या जागेवर नियुक्ती मिळण्यासाठी १० जून २०१९ रोजी अर्ज केला. सरकारने त्या अर्जाची दखल घेतली नाही. करिता, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नोकरीची गरज नाही

आरती यांनी १७ नोव्हेंबर २०१९ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या वडिलांचे निधन १९९५ मध्ये झाले. दरम्यान, या कुटुंबाने तब्बल २४ वर्षे स्वत:ला सांभाळले. त्यावरून त्यांना तातडीने नोकरी मिळविण्याची गरज नव्हती हे दिसून येते, असे निरीक्षणदेखील न्यायालयाने नोंदविले, तसेच या स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला अनुकंपा नोकरी दिली जाऊ शकते हे आरती यांना रेकॉर्डवर आणता आले नाही, याकडेही लक्ष वेधले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय