शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वकिलांनाही हवी सवलतीच्या दरात विमा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेप्रमाणे नागपुरातील उच्च न्यायालय वकील संघटना व जिल्हा वकील संघटना यांनीही सदस्यांना सवलतीच्या दरात ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेप्रमाणे नागपुरातील उच्च न्यायालय वकील संघटना व जिल्हा वकील संघटना यांनीही सदस्यांना सवलतीच्या दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

कोरोना संक्रमणामुळे गेल्या काही महिन्यांत नागपुरातील ४० ते ५० वकिलांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी काही वकिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. परिणामी, संबंधित कुटुंबांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशी वेळ कोणत्याही वकिलाच्या कुटुंबावर येऊ नये याकरिता जीवन विमा अत्यंत आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेने सदर बाब लक्षात घेता सदस्यांना सवलतीच्या दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात नागपुरातील काही ज्येष्ठ वकिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी उच्च न्यायालय वकील संघटना व जिल्हा वकील संघटना यांनीही अशी योजना आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.

अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी कोरोनाकाळात वकिलांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे अनेक वकिलांची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांची आबळ होणे निश्चित आहे. करिता, संघटनांनी विमा योजनेवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अ‍ॅड. शैलेश नारनवरे व अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनीही जीवन विमा योजनेच्या मागणीचे समर्थन केले. सदस्यांना फार आधीच सवलतीच्या दरात विमा योजना उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु, आताही वेळ गेली नाही. याविषयी तातडीने निर्णय घेऊन चूक सुधारली जाऊ शकते. संघटनांनी सदस्यांची चिंता करावी व त्यांच्या हितासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे, असेही नारनवरे व भांडारकर यांनी सांगितले.

---------------

कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे

वकिलांना चांगली जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. कंपन्यांकडून समाधानकारक प्रस्ताव येण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच लगेच आवश्यक निर्णय घेतला जाईल.

----- अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर, सचिव, उच्च न्यायालय वकील संघटना

-------------

गरजू वकिलांना लाभ देऊ

दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलेल्या वकिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यावर काम केले जात आहे. कंपन्यांशी चर्चा झाली आहे.

----- अ‍ॅड. कमल सतुजा, अध्यक्ष, जिल्हा वकील संघटना