शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

रस आणि मयसिद्धांतातला पुरुषार्थ विषमतेचा पुरस्कर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST

- यशवंत मनोहर : ‘मुक्तिबोधांचा साहित्यविचार’ व्याख्यानमाला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी तत्कालीन भारतीय साहित्य विचार ...

- यशवंत मनोहर : ‘मुक्तिबोधांचा साहित्यविचार’ व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी तत्कालीन भारतीय साहित्य विचार आणि मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र खोडून काढत नवा मानुष्यसिद्धांत प्रस्थापित केला. भारतीय संस्कृत साहित्यातला रससिद्धांत आणि मराठीतील मर्ढेकरांचा मयसिद्धांत या सौंदर्यशास्त्रातील पुरुषार्थाचा धिक्कार मुक्तिबोधांनी केला आणि हे सिद्धांत सरंजामशाही व विषमतेला प्रेरित करणारे असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सौंदर्यशास्त्रातील मानुष्यसिद्धांत प्रकट केल्याचे मत प्रख्यात आंबेडकरवादी चिंतक प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत मनोहर बोलत होते. ‘मुक्तिबोधांचा साहित्य विचार’ या विषयावर त्यांनी व्याख्यान गुंफले. या आभासी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते.

भारतीय साहित्य विश्वातील सौंदर्यशास्त्रातील पुरुषार्थ हा मूठभर अभिजनांच्या वृत्तीला चालना देणारा होता. रससिद्धांत हा शोषणाचा सिद्धांत असून, आधुनिक साहित्याचे समीक्षण या सिद्धांताने शक्य नाही. संवेदना शुद्ध असतात आणि त्याला नियमांचे आवरण घालता येत नाही. म्हणूनच रस आणि लय सिद्धांत भ्रष्ट असल्याचे ठाम मत मुक्तिबोधांचे होते, असे मनोहर म्हणाले. साहित्य ही भ्रष्ट कला नसून ती संवादी संघटना आहे आणि कलावंतांच्या जाणिवेतूनच ते आकार घेत असते. त्या जाणिवेतील द्वंद्वांतूनच त्याची जडणघडण होत असते, असे भाव यशवंत मनोहर यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. संचालन ऋचा वगरकर-मांजरखेडे यांनी केले.

......