शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपचार शुल्क निश्चितीवर महाधिवक्ता मांडणार बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:35 IST

Private Hospitals, Corona Charges, Nagpur news खासगी रुग्णालये, नर्सिंग होम्स व क्लिनिक्स यांनी किती उपचार शुल्क आकारावे याचे दर राज्य सरकारने ठरवून दिले आहेत. यासंदर्भात २१ मे २०२० रोजी वादग्रस्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरकारच्या निर्णयाला खासगी रुग्णालयांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी रुग्णालये, नर्सिंग होम्स व क्लिनिक्स यांना कोरोना नसलेल्या रुग्णांकडून आकारण्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या उपचार शुल्काच्या वैधतेवर राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये बाजू मांडणार आहेत. त्यासाठी न्यायालयाने त्यांना ६ ऑक्टोबर ही तारीख दिली आहे.सध्याच्या कोरोना संक्रमण काळामध्ये खासगी रुग्णालये, नर्सिंग होम्स व क्लिनिक्स यांनी कोरोना रुग्ण व कोरोना नसलेल्या रुग्णांकडून किती उपचार शुल्क आकारावे याचे दर राज्य सरकारने ठरवून दिले आहेत. यासंदर्भात २१ मे २०२० रोजी वादग्रस्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्याविरुद्ध हॉस्पिटल्स असोसिएशन नागपूर व डॉ. प्रदीप अरोरा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. खासगी रुग्णालयांनी कोरोना नसलेल्या रुग्णांकडून किती उपचार शुल्क घ्यावे हे ठरवण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

ही याचिका न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली असता सहायक सरकारी वकील अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी सरकारच्या अधिसूचनेवर महाधिवक्ता बाजू मांडणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे न्यायालयाने याचिकेवर ६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करून त्या तारखेला महाधिवक्त्यांनी बाजू मांडण्यासाठी सज्ज राहावे असे सांगितले. उपस्थित राहणे शक्य नसल्यास दुसऱ्या वकिलाची व्यवस्था आधीच करून ठेवावी. त्यामुळे प्रकरणावर पुढील कार्यवाही करता येईल, असेही न्यायालयाद्वारे नमूद करण्यात आले.

अंतरिम आदेश कायमकोरोना नसलेल्या रुग्णांकडून घेण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या उपचार दरावर उच्च न्यायालयाने गेल्या तारखेला स्थगिती दिली. तो अंतरिम आदेश ६ ऑक्टोबरपर्यंत लागू ठेवण्यात आला. न्यायालयाकडून वारंवार संधी मिळूनही राज्य सरकारने वादग्रस्त अधिसूचनेची वैधता सिद्ध केली नाही. त्यामुळे न्यायालयाने संबंधित स्थगनादेश देऊन सरकारला दणका दिला.

याचिका स्थानांतरणावर निर्णय नाहीसमान विषयावरील काही याचिका मुंबई मुख्यालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ही याचिका मुंबई मुख्यालयात स्थानांतरित करण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी मुख्य न्यायमूर्तींना अर्ज सादर केला आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. परिणामी, नागपूर खंडपीठाने या याचिकेवरील कार्यवाही सुरू ठेवली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय