शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

हवामान बदलाचा राज्यातील शेतपिकांवर वाईट परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 08:00 IST

Nagpur News राज्यातील शेतपिकांवर हवामान बदलाचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनीदेखील ही बाब मान्य केली आहे.

उदय अंधारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राज्यातील शेतपिकांवर हवामान बदलाचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनीदेखील ही बाब मान्य केली आहे. (Adverse effects of climate change on agriculture in the state)

शेतातून अधिक उत्पादन घेण्यासाठी जैविक व अजैविक घटक नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अजैविक घटकांमध्ये ऊन, वारा, पाऊस, ढग, माती, धूळ, वातावरणातील वायू, आर्द्रता व तापमान तर, जैविक घटकांमध्ये मातीमधील सूक्ष्मजीव, परागकण, कीटक, बुरशी, प्राणी व माणसांचा समावेश होतो. त्यातील हस्तक्षेपामुळे तापमान वृद्धी, दुष्काळ, पूर, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक संकटे वाढली आहेत. त्याचा वाईट परिणाम शेतपिकांवर होत आहे. हवामान बदलाचा अधिक परिणाम सोयाबीन, कापूस, गहू, चणा व धान पिकावर झाला आहे. याशिवाय जनावरांची मुदतपूर्व प्रसूती होत आहे.

विदर्भामध्ये गहू व ज्वारी बियाण्यांची उगवण क्षमता कमी झाली आहे. कापसाची बोंडे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच फुटत आहेत. लिंबूवर्गीय फळे मोठ्या संख्येत गळून पडत आहेत. सोयाबीन पिवळे होत आहे. पाऊस अनियमित होत आहे. पश्चिम व मध्य महाराष्ट्र भागात दरवर्षी ६०० ते १००० मिलीमीटर पाऊस पडतो. विदर्भात गेल्या दोन वर्षात १२०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत आहे.

कापसावर अळ्यांचे संकट

आधी केवळ अमेरिकन बॉलवॉर्म कापसावर हल्ला करीत होते. आता बॉलवॉर्मसह शोषक अळ्याही कापूस नष्ट करीत आहे. कापसासह उडीद, मूग, सोयाबीन इत्यादी पिकेही संकटात आहेत. हा हवामान बदलाचा परिणाम आहे.

-- माधव शेंबेकर, संचालक, अंकुर सीड्स.

उत्पादन कमी झाले

हवामान बदलाचा परिणाम शेतपिकाच्या उत्पादनावरही होत आहे. संत्री, मोसंबी व सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. पिकांवर अळ्या, कीटक व बुरशीचा हल्ला होत आहे. पूर्व विदर्भातील धान पिकाचेही नुकसान होत आहे.

-- डॉ. निशांत शेंडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालय.

टॅग्स :agricultureशेती