शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

हवामान बदलाचा राज्यातील शेतपिकांवर वाईट परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 08:00 IST

Nagpur News राज्यातील शेतपिकांवर हवामान बदलाचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनीदेखील ही बाब मान्य केली आहे.

उदय अंधारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राज्यातील शेतपिकांवर हवामान बदलाचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनीदेखील ही बाब मान्य केली आहे. (Adverse effects of climate change on agriculture in the state)

शेतातून अधिक उत्पादन घेण्यासाठी जैविक व अजैविक घटक नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अजैविक घटकांमध्ये ऊन, वारा, पाऊस, ढग, माती, धूळ, वातावरणातील वायू, आर्द्रता व तापमान तर, जैविक घटकांमध्ये मातीमधील सूक्ष्मजीव, परागकण, कीटक, बुरशी, प्राणी व माणसांचा समावेश होतो. त्यातील हस्तक्षेपामुळे तापमान वृद्धी, दुष्काळ, पूर, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक संकटे वाढली आहेत. त्याचा वाईट परिणाम शेतपिकांवर होत आहे. हवामान बदलाचा अधिक परिणाम सोयाबीन, कापूस, गहू, चणा व धान पिकावर झाला आहे. याशिवाय जनावरांची मुदतपूर्व प्रसूती होत आहे.

विदर्भामध्ये गहू व ज्वारी बियाण्यांची उगवण क्षमता कमी झाली आहे. कापसाची बोंडे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच फुटत आहेत. लिंबूवर्गीय फळे मोठ्या संख्येत गळून पडत आहेत. सोयाबीन पिवळे होत आहे. पाऊस अनियमित होत आहे. पश्चिम व मध्य महाराष्ट्र भागात दरवर्षी ६०० ते १००० मिलीमीटर पाऊस पडतो. विदर्भात गेल्या दोन वर्षात १२०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत आहे.

कापसावर अळ्यांचे संकट

आधी केवळ अमेरिकन बॉलवॉर्म कापसावर हल्ला करीत होते. आता बॉलवॉर्मसह शोषक अळ्याही कापूस नष्ट करीत आहे. कापसासह उडीद, मूग, सोयाबीन इत्यादी पिकेही संकटात आहेत. हा हवामान बदलाचा परिणाम आहे.

-- माधव शेंबेकर, संचालक, अंकुर सीड्स.

उत्पादन कमी झाले

हवामान बदलाचा परिणाम शेतपिकाच्या उत्पादनावरही होत आहे. संत्री, मोसंबी व सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. पिकांवर अळ्या, कीटक व बुरशीचा हल्ला होत आहे. पूर्व विदर्भातील धान पिकाचेही नुकसान होत आहे.

-- डॉ. निशांत शेंडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालय.

टॅग्स :agricultureशेती