शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा अन् जलद सेवा द्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 21:12 IST

Nagpur News तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितले.

 

नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होत आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितले. वनामती सभागृहात आयोजित महसूल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यावेळी उपस्थित होते.

जमिनीच्या नोंदी, अभिलेख अचूक ठेवणे हे महसूल विभागाचे महत्त्वाचे काम आहे. इतर कामांमुळे याकडे दुर्लक्ष होणार नाही, यासाठी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, असे सुधांशू यावेळी म्हणाले.

प्रास्ताविक महसूल उपायुक्त मिलिंदकुमार साळवे यांनी केले. संचालन सामान्य प्रशासन उपायुक्त आशा पठाण यांनी केले

जमिनीच्या मोजणीसाठी लवकरच रोव्हर मशीनचा वापर

. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामामध्ये अनेक चांगले बदल होत आहेत. लवकरच जमिनीच्या मोजणीसाठी रोव्हर मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसांत होणारी जमीन मोजणी अवघ्या काही मिनिटात पूर्ण करणे शक्य होईल. पीक कर्ज अथवा इतर कर्जासाठी आवश्यक महसूल विभागाशी संबंधित अभिलेख बँकांना ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे सुधांशू यांनी सांगितले.

कोविडमध्ये महसूल विभागाचे काम उत्तम

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. कोविडसारख्या असाधारण परिस्थितीमध्येही या विभागाने चांगले काम केले, असे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या या विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी, तसेच प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर, जमीन महसूलविषयक कायदे आदी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार असून त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Governmentसरकार