शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कळमना मार्केटबाबत प्रशासन गंभीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 21:01 IST

कळमना मार्केटमध्ये सोईसुविधांचा अभाव आणि प्रशासन ढिम्म असल्यावर प्रकाश टाकणारी बातमी लोकमतने शुक्रवारी कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट या मथळ्याखाली प्रकाशित केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ : उपाययोजना व साफसफाईचा अभाव, लिलावावेळी गर्दी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना मार्केटमध्ये सोईसुविधांचा अभाव आणि प्रशासन ढिम्म असल्यावर प्रकाश टाकणारी बातमी लोकमतने शुक्रवारी कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट या मथळ्याखाली प्रकाशित केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. कॅबिनमध्ये बसून कारभार करण्याऐवजी मार्केट परिसरात फिरून कोरोनावर कसे नियंत्रण मिळविता येईल, यावर वरिष्ठ अधिकारी स्तरावर मंथन करण्यात आले. शुक्रवारी सर्वच बाजारपेठा बंद असतानाही स्वच्छता आणि साफसफाईवर भर देण्यात आला नाही. या संदर्भात प्रशासक राजेश भुसारी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यामुळे मार्केटमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा खुलासा झाला नाही.लोकमतच्या बातमीची जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक राजेश भुसारी यांना विचारण करण्यात आल्याची माहिती आहे. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा-बटाटा बाजार अडतिया वेलफेअर असोसिएशन, कळमना धान्यगंज अडतिया, युवा अडतिया सब्जी असोसिएशन, कळमना होलसेल मिरची मार्केट असोसिएशन, कळमना फ्रूट मार्केट असोसिएशन, होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशन आदी सहा बाजार आहे. या बाजारांमध्ये दरदिवशी १४ ते १५ हजार लोकांची गर्दी आहे. प्रशासकाचा वरदस्त नसल्याने कुणीही सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. पावसाळ्यामुळे धान्य बाजारात गर्दी नसते, पण भाजी बाजार आणि फळ बाजारात दरदिवशी होणारी गर्दी नेहमीचीच आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची प्रशासकाची जबाबदारी आहे. पण ते बाजाराची पाहणी करण्याऐवजी कॅबिनमध्ये बसूनच कारभार करतात, असा आरोप नाव न सांगण्याच्या अटीवर काही व्यापाऱ्यांनी केला. कळमना मार्केटबाबत प्रशासक गंभीर नाही. प्रशासकाने पूर्वीपासूनच गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या असत्या तर आज मार्केटवर ही वेळ आली नसती, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.फळांच्या लिलावावेळी असते गर्दीसध्या मोसंबीचा हंगाम सुरू आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त टेम्पोतून मोसंबी बाजारात येते. शनिवारी फळांचा लिलाव असतो. त्यावेळी शेतकरी, ग्राहक, व्यापारी आणि अडतियांची प्रचंड गर्दी असते. हजारापेक्षा जास्त लोक दाटीदाटीने उभे असतात. यातून कोरोना संसर्गाचा जास्त धोका असतो. अनेकजण लिलावातून कोरोना घेऊन गावाकडे परततात. या माध्यमातून गावागावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासक राजेश भुसारी यांनी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्या