शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

कुही नगर पंचायतचा कारभार ‘प्रभारी’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : गेल्या १३ महिन्यांपासून कुही नागरपंचायतीचा कारभार ‘प्रभारी’भराेसे असून, या ठिकाणी पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांसाठी प्रतीक्षाच करावी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : गेल्या १३ महिन्यांपासून कुही नागरपंचायतीचा कारभार ‘प्रभारी’भराेसे असून, या ठिकाणी पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. दुसरीकडे नगरपंचायतीमधील इतर काही अधिकारी प्रभारीवर असल्याने, शहरातील विकासकामांसह कार्यालयीन कामकाज प्रभावित हाेत आहे. त्यामुळे कुही येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळणार तरी कधी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

तत्कालीन मुख्याधिकारी सुचिता पानसरे यांची ११ ऑगस्ट, २०२०ला बदली झाली. तेव्हापासून या नगरपंचायतीचा कारभार प्रभारी अधिकारी सांभाळत आहेत. गेल्या वर्षभरापासून कुही नगरपंचायतीचा कारभार एकापाठाेपाठ चार अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदावर देण्यात आला. सुरुवातीला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून सुवर्णा दखणे, त्यानंतर काही दिवसांकरिता तहसीलदार बाबाराव तिनघसे, त्यानंतर पुन्हा सुवर्णा दखणे यांच्याकडेच प्रभार साेपविला गेला. मात्र, दखणे यांच्याकडे भिवापूरसह उमरेड नगरपरिषदेची जबाबदारी असल्याने, त्यांच्याकडून कुहीचा प्रभार काढून घेत, माैदा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी काेमल कराळे यांच्याकडे कुही नगरपंचायतीचा प्रभार देण्यात आला आहे. प्रभारी मुख्याधिकारी असल्याने, त्या कुही येथे फार कमी वेळ देत असून, यामुळे बरेच विकास कामे प्रभावित झाली आहेत, शिवाय अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. साेबतच काेराेना काळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे कर निर्धारण अधिकारी सुहास मिसाळ यांची नुकतीच बदली झाली. त्यामुळे कर विभागही प्रभारीवरच आला आहे.

शहरातील प्रमुख समस्या असलेल्या पाणीपुरवठासह स्वच्छता विभाग तर नगरपंचायतीच्या स्थापनेपासूनच प्रभारी पदावर चालविला जात आहे. अद्यापही स्थायी स्वच्छता व पाणीपुुरवठा अभियंता या नगरपंचायतीला लाभलेला नाही. त्यातही या विभागाची जबाबदारी असलेले प्रभारी अभियंता नीलेश नरपाचे हे सुट्टीवर असल्याने दाेन्ही विभाग प्रभावित झाले असून, शहरात अस्वच्छतेने घर केले आहे.

काेराेना काळात नगरपंचायतीच्या बहुतेक विभागाचे काम कार्यालयीन अधीक्षक देवाजी सडमेक सांभाळत आहेत. काेराेनाच्या दाेन्ही लाटेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नसताना शहराची जबाबदारी सांभाळण्यात, काेराेना नियंत्रित ठेवण्यात सडमेक यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. एकूणच प्रभारीभराेसे असलेल्या या नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांसह इतर विभागात स्थायी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.