शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
5
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
6
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
7
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
8
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
9
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
10
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
11
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
12
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
13
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
14
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
15
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
16
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
17
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
18
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
19
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
20
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."

जातिवाचक नावे बदलण्याबाबत प्रशासनच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:07 IST

आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु ...

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु प्रशासन स्तरावर मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. नागपूर विभागाचाच विचार केला तर आतापर्यंत केवळ नागपूर व वर्धा जिल्ह्यानेच जातिवाचक नावे बदलण्यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. उर्वरित भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र राज्यात अजूनही अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावांना, वस्त्यांना, रस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे ही नावे बदलवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे ११ डिसेंबर २०२० राेजी शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आला. ९ महिने उलटत आले तरी यासंदर्भात कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम यासंदर्भातील महत्त्वाची बैठक घेतली आणि विभागातील सर्व जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, नगर परिषद प्रशासन यांना त्यांच्या-त्यांच्या क्षेेत्रातील जातिवाचक गावांची, रस्त्यांची, वस्त्यांची नावे बदलवण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही करवाई पूर्ण करण्याचे आणि यासंदर्भातील अहवाल सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही बजावले.

बॉक्स

- नागपूर जिल्ह्यातील ६१ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली.

आतापर्यंत केवळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यानेच जातिवाचक गावांची नावे बदलण्याची कारवाई केली असून तसा अहवालसुद्धा सादर केला आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल ६१ जातिवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. नागपूर महापालिकेचा अहवाल अद्याप सादर व्हायचा आहे. सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांनी सुद्धा अद्याप अहवाल सादर केलेला नाही. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही कारवाई पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

- महापुरुषांची नावे द्यायची आहेत

राज्यातील सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जातिवाचक गावांची नवे बदलून त्याऐवजी महापुरुषांची नवे द्यायची आहेत, असे शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे. ज्योतिबा फुले, रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, समता, सिद्धार्थ अशी नावे द्यावयाची आहेत.