शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जातिवाचक नावे बदलण्याबाबत प्रशासनच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:07 IST

आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु ...

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु प्रशासन स्तरावर मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. नागपूर विभागाचाच विचार केला तर आतापर्यंत केवळ नागपूर व वर्धा जिल्ह्यानेच जातिवाचक नावे बदलण्यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. उर्वरित भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र राज्यात अजूनही अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावांना, वस्त्यांना, रस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे ही नावे बदलवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे ११ डिसेंबर २०२० राेजी शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आला. ९ महिने उलटत आले तरी यासंदर्भात कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम यासंदर्भातील महत्त्वाची बैठक घेतली आणि विभागातील सर्व जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, नगर परिषद प्रशासन यांना त्यांच्या-त्यांच्या क्षेेत्रातील जातिवाचक गावांची, रस्त्यांची, वस्त्यांची नावे बदलवण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही करवाई पूर्ण करण्याचे आणि यासंदर्भातील अहवाल सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही बजावले.

बॉक्स

- नागपूर जिल्ह्यातील ६१ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली.

आतापर्यंत केवळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यानेच जातिवाचक गावांची नावे बदलण्याची कारवाई केली असून तसा अहवालसुद्धा सादर केला आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल ६१ जातिवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. नागपूर महापालिकेचा अहवाल अद्याप सादर व्हायचा आहे. सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांनी सुद्धा अद्याप अहवाल सादर केलेला नाही. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही कारवाई पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

- महापुरुषांची नावे द्यायची आहेत

राज्यातील सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जातिवाचक गावांची नवे बदलून त्याऐवजी महापुरुषांची नवे द्यायची आहेत, असे शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे. ज्योतिबा फुले, रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, समता, सिद्धार्थ अशी नावे द्यावयाची आहेत.