शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रायपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 27, 2017 02:14 IST

भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात होऊन रायपूर (छत्तीसगड) येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

पुतण्या आणि भाऊ जखमी : साहोली गावाजवळील घटनानागपूर / पारशिवनी : भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात होऊन रायपूर (छत्तीसगड) येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. इसरार हुसेन खान (६४, रा. व्हीआयपी इस्टेट, खमारडी, रायपूर, छत्तीसगड) असे मृत अप्पर पोलीस अधीक्षकांचे नाव आहे. हा भीषण अपघात पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी-खापरखेडा मार्गावरील साहोली गावाजवळ रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला. अपघातात खान यांचा भाऊ आणि पुतण्या जबर जखमी झाले.इसरार खान हे छत्तीसगड पोलीस दलात कार्यरत होते. पाच वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. मात्र, चांगल्या सेवेमुळे त्यांना सरकारने सेवानिवृत्तीनंतर सेवाविस्तार दिला. सध्या ते रायपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. मुलीच्या विवाहाच्या संबंधाने चर्चा करायची असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलीसह ते नागपुरात आले होते. येथील जाफरनगरात त्यांचे लहान बंधू इरफान हुसेन खान परिवारासह राहतात. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली परिसरात जंगल सफारीसाठी जावे म्हणून भल्या पहाटे ते त्यांचे बंधू इरफान आणि पुतण्या मोहम्मद शादाब खान यांच्यासोबत जाफरनगरातून निघाले. रविवारी सकाळी एमएच-१२/के व्ही-८४४१ क्रमांकाच्या एक्सयुव्ही कारने जंगल सफारीचा आनंद घेतल्यानंतर ते परत नागपूरकडे निघाले. सकाळी सुमारे १० च्या सुमारास साहोली गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे कारवरून शादाबचा ताबा सुटला. अनियंत्रित कार तीन कोलांट्या घेत उलटली. त्यामुळे इसरार खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लगेच नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती कळताच नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी रुग्णालय आणि अपघातस्थळाकडे धावले. छत्तीसगड पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली.(प्रतिनिधी)जायचे होते दिल्लीला...!दिल्लीत राहणाऱ्या डॉक्टर मुलाकडे जाऊन मुलीच्या लग्नासंबंधीचा विचारविमर्श करण्यासाठी रविवारी खान त्यांची पत्नी आणि मुलीसह दिल्लीला जाणार होते. मात्र, मध्येच त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली. त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्याऐवजी पत्नी आणि मुलीला त्यांचा मृतदेह रायपूरला नेण्याची दुर्दैवी वेळ आली.