शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

रायपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 27, 2017 02:14 IST

भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात होऊन रायपूर (छत्तीसगड) येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

पुतण्या आणि भाऊ जखमी : साहोली गावाजवळील घटनानागपूर / पारशिवनी : भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात होऊन रायपूर (छत्तीसगड) येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. इसरार हुसेन खान (६४, रा. व्हीआयपी इस्टेट, खमारडी, रायपूर, छत्तीसगड) असे मृत अप्पर पोलीस अधीक्षकांचे नाव आहे. हा भीषण अपघात पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी-खापरखेडा मार्गावरील साहोली गावाजवळ रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला. अपघातात खान यांचा भाऊ आणि पुतण्या जबर जखमी झाले.इसरार खान हे छत्तीसगड पोलीस दलात कार्यरत होते. पाच वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. मात्र, चांगल्या सेवेमुळे त्यांना सरकारने सेवानिवृत्तीनंतर सेवाविस्तार दिला. सध्या ते रायपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. मुलीच्या विवाहाच्या संबंधाने चर्चा करायची असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलीसह ते नागपुरात आले होते. येथील जाफरनगरात त्यांचे लहान बंधू इरफान हुसेन खान परिवारासह राहतात. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली परिसरात जंगल सफारीसाठी जावे म्हणून भल्या पहाटे ते त्यांचे बंधू इरफान आणि पुतण्या मोहम्मद शादाब खान यांच्यासोबत जाफरनगरातून निघाले. रविवारी सकाळी एमएच-१२/के व्ही-८४४१ क्रमांकाच्या एक्सयुव्ही कारने जंगल सफारीचा आनंद घेतल्यानंतर ते परत नागपूरकडे निघाले. सकाळी सुमारे १० च्या सुमारास साहोली गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे कारवरून शादाबचा ताबा सुटला. अनियंत्रित कार तीन कोलांट्या घेत उलटली. त्यामुळे इसरार खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लगेच नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती कळताच नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी रुग्णालय आणि अपघातस्थळाकडे धावले. छत्तीसगड पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली.(प्रतिनिधी)जायचे होते दिल्लीला...!दिल्लीत राहणाऱ्या डॉक्टर मुलाकडे जाऊन मुलीच्या लग्नासंबंधीचा विचारविमर्श करण्यासाठी रविवारी खान त्यांची पत्नी आणि मुलीसह दिल्लीला जाणार होते. मात्र, मध्येच त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली. त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्याऐवजी पत्नी आणि मुलीला त्यांचा मृतदेह रायपूरला नेण्याची दुर्दैवी वेळ आली.