शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

केबल जोडण्याची लपवाछपवी थांबणार

By admin | Updated: March 30, 2015 02:23 IST

दर तीन महिन्यातून एक वेळा एक केबल आॅपरेटकरकडे असलेल्या जोडणीधारकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

नागपूर: केबल जोडण्यांची खरी संख्या लपवून करमणूक कर चोरी करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दर तीन महिन्यातून एक वेळा एक केबल आॅपरेटकरकडे असलेल्या जोडणीधारकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यातून संबंधित आॅपरेटरकडे जोडण्यांची प्रत्यक्षात संख्या किती आहे हे तपासण्याचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मुख्य केबल आॅपरेटर किंवा स्थानिक केबल आॅपरेटर यांनी दिलेल्या केबल जोडण्यांच्या संख्येवर विश्वास ठेवून त्यावर आधारित करमणूक कराची आकारणी केली जाते. अनेक वेळा आॅपरेटर त्यांच्याकडील जोडण्यांची संख्या कमी दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचे निदर्शनास आल्यावर शासनाने केबल जोडण्यांचे विनाक्रम (रॅण्डम) सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र करमणूक शुल्क १९२३ च्या कलम ८ अन्वये करमणूक स्थळाची तपासणी करण्याचा प्रशासनाला अधिकार आहे. त्याचा वापर या सर्वेक्षणासाठी करण्यात येणार आहे.सुरुवातीला मुख्य केबल आॅपरेटर आणि स्थानिक केबल आॅपरेटर यांच्याकडे असलेल्या ग्राहकसंख्येच्या आधारावर त्यांचे वर्गीकरण करण्यात येणार असून त्यानंतर प्रत्येक महिन्यात केबल आॅपरेटर किंवा मुख्य केबल आॅपरेटर यांच्याकडील जोडण्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी एक विशेष पथक स्थापन केले जाणार असून त्यात उपजिल्हाधिकारी दर्जाचा एक अधिकारी,तहसीलदार, करमणूक कर निरीक्षक आणि लिपिक यांचा समावेश अस्ोल. या तपासणीत आॅपरेटरने जोडण्यांची संख्या लपविल्याचे दिसून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.दोन वर्षापासून नागपूर जिल्ह्यात जोडणीधारकांची संख्या ४ लाख ३४ हजार दाखविण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. मात्र तपासणी करणारी यंत्रणा नसल्याने आॅपरेटर सांगेल त्याच संख्येवर विश्वास ठेवण्याखेरीज प्रशासनाकडे सध्या तरी पर्याय नव्हता. आता तपासणी सुरू झाल्यानंतर यातील लपवाछपवी बंद होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)