शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
3
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
4
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
5
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
6
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
7
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
8
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
9
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
10
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
11
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
12
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
13
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
14
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
15
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
16
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
17
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
18
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
19
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
20
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन

बंदुकीने नाही, शिक्षणाने आदिवासींची स्थिती बदलेल

By admin | Updated: October 12, 2015 02:49 IST

आदिवासी समाजात अंधश्रद्धा आहे. आदिवासींची मुले कुपोषणाचे बळी ठरत आहेत.

उमेश चौबे : गोंडी भाषिक आदिवासी संस्थेचा लोकार्पण सोहळा थाटातनागपूर : आदिवासी समाजात अंधश्रद्धा आहे. आदिवासींची मुले कुपोषणाचे बळी ठरत आहेत. तरी सरकार लक्ष देत नाही. यापुढील काळात आदिवासींनी केवळ मतदाता बनून राहू नये. मात्र बंदुका हातात घेतल्यानेही आदिवासींची स्थिती बदलणार नाही. आदिवासींच्या दशेत परिवर्तन करायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी व्यक्त केले. गोंडी भाषिक संस्थेच्या लोकार्पण सोहळ््यात ते बोलत होते.गोंडी भाषिक आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्थेचा लोकार्पण सोहळा रविवारी थाटात पार पडला. चंद्रमणी सभागृह, नवजीवन कॉलनी, वर्धा रोड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात समादेशक एन. झेड. कुंभरे, राजमाता राजश्री शाह, डॉ. पिनाक दंदे, वासुदेव टेकाम, संस्थेचे अध्यक्ष महादेव मडावी, उपाध्यक्ष तुकाराम गेडाम, शंकरराव मरसकोल्हे, ज्येष्ठ साहित्यिक मंसाराम कुंभरे आदी मान्यवर उपस्थित होते. उमेश चौबे म्हणाले, गोंडी भाषा या देशाची सर्वात जुनी भाषा आहे. निसर्गाचे गूढ उकलण्यासाठी ही भाषा टिकणे गरजेचे आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांनी तरी गोंडी भाषा व्यवहारात वापरून जिवंत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वासुदेव टेकाम म्हणाले, वर्षनुवर्षे रानावनात राहणारा आदिवासी समाज स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही हलाखीचे जीवन जगत आहे. या समाजावर कायम अन्याय करण्यात आला. राज्यघटनेत समाजाला आरक्षण दिले आहे, मात्र शिक्षणाअभावी त्याचा लाभ घेता आला नाही. उलट बोगस आदिवासींनी समाजाच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे. अशावेळी खऱ्या आदिवासींना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून आदिवासी बांधवांनो उपास-तापास सहन करा, मात्र आपल्या मुलांना शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. पिनाक दंदे यांनी आर्थिकदृष्ट्या सबळ झालेल्या समाजातील लोकांनी तळातील बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले. एन. झेड. कुंभरे यांनी, बोगस आदिवासीमुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या आदिवासींना फटका बसत असल्याचे सांगत, मुलांनी शिक्षण घेऊन पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त केली. या कार्यक्रमादरम्यान समाजातील १० वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, समाजकार्यात योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सोबतच समाजातील उपवर वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. संचालन विकास तुमडाम यांनी केले. प्रदीप मसराम यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)